Marathi Biodata Maker

५००० एसटी बसेस एलएनजीवर धावणार

बुधवार, 7 फेब्रुवारी 2024 (09:57 IST)
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसेसचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणार आहेत. त्यामाध्यमातून एसटी महामंडळाचे वर्षाला २३४ कोटी रुपयांची बचत होणार आहे. यासाठी किंग्ज गॅस कंपनीसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला आहे.
 
या एलएनजी इंधन वापरामुळे डिझेल इंधनाच्या वाहनांमुळे होणा-या प्रदूषणामध्ये सुमारे दहा टक्के घट होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर महामंडळाचे दरवर्षी २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होणार आहे. प्रवाशांना किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सेवा मिळणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, किंग गॅस कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक कुरेशी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्ष-या केल्या. यावेळी उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, महाव्यवस्थापक ( भांडार व खरेदी) वैभव वाकोडे, महाव्यवस्थापक (यंत्र) नंदकुमार कोलारकर उपस्थित होते.
 
एकूण ५००० डिझेल वाहनांचे एलएनजी वाहनांमध्ये रुपांतरण हे तीन वर्षामध्ये एकूण ६ टप्यात करण्यात येणार आहे. संपूर्ण पाच हजार बसेसचे रुपांतरण झाल्यानंतर दरवर्षी महामंडळाचे सुमारे २३४ कोटी रुपयांची बचत होण्यास मदत होईल. राज्यातील ९० आगारांमध्ये एलएनजी इंधन भरण्याची सोय करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे डिझेल इंधनावर चालणारी सुमारे १६ हजार प्रवाशी वाहने आहेत. महामंडळाच्या एकूण खर्चापैकी सुमारे ३४ टक्के खर्च डिझेलवर केला जातो. हरित परिवहनाची संकल्पना राबविण्यासाठी डिझेल ऐवजी पर्यायी इंधन वापरण्यासाठी उद्योग विभागाने महाराष्ट्रासाठी एलएनजी या पर्यायी इंधनाचा पुरवठा करण्यासाठी किंग्स गॅस प्रा.लि. यांचेबरोबर सामंजस्य करार केला आहे.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

भारतात टेलिग्रामवर तात्पुरती बंदी: नीट पुनर्परीक्षेपूर्वी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

LIVE: ज्यांना जायचे आहे, त्यांनी आनंदाने जावे, उद्धव ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

रोहित पवार यांचे उपोषण संपले; शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा २२ जून रोजी सोडवला जाणार

आशियाई खेळांसाठी भारतीय टेनिस संघाची घोषणा, सुमित-सहाजा नेतृत्व करणार

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै दरम्यान मुंबईत होणार

पुढील लेख
Show comments