suvichar

10th results दहावीच्या परीक्षेत मातृभाषेत मराठी विषयात ९४,५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले; चिंतेची बाब समोर आली

वेबदुनिया न्यूज टीम
शनिवार, 9 मे 2026 (09:50 IST)
दहावीचा निकाल लागला असून यंदाच्या दहावीच्या परीक्षेत मातृभाषेत (मराठी) उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९२% असून तब्बल ९४ हजार विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण झाले आहे ही चिंतेची बाब समोर आली आहे.
 
ही आकडेवारी खरोखरच धक्कादायक आणि विचार करायला लावणारी आहे. महाराष्ट्रात राहून आणि मराठी ही मातृभाषा असूनही एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी मराठी विषयात अनुत्तीर्ण होणे, ही शैक्षणिक क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
 
महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या २०२६ निकालानुसार (८ मे २०२६ रोजी जाहीर) राज्याचा एकूण उत्तीर्णता दर ९२.०९% आहे. पण मराठी विषयात (मातृभाषा/प्रथम भाषा म्हणून) तब्बल ९४,५४४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहे.
 
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असताना, आपल्या स्वतःच्या मातृभाषेत एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी अपयशी ठरत असतील, हे शिक्षणव्यवस्थेसाठी, अभ्यासक्रमासाठी आणि पालक-शिक्षकांसाठी विचार करण्यासारखे आहे.
ALSO READ: महाराष्ट्रात काही ठिकाणी भीषण उष्णता तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसासाठी ऑरेंज अलर्ट
मराठी ही केवळ विषय नाही, तर आपली ओळख आणि संस्कृती आहे. दहावी ही पायाभूत परीक्षा असते; यात मातृभाषेत मजबूत पाया नसेल तर पुढील शिक्षणातही अडचणी येऊ शकतात. तसेच शिक्षण विभाग, बोर्ड, शाळा आणि पालकांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अभ्यासक्रम अधिक आकर्षक करणे, वाचन संस्कृती वाढवणे, शिक्षक प्रशिक्षण आणि मराठी माध्यम शाळांना प्रोत्साहन देणे यासारख्या उपाययोजना हातात घ्याव्या लागतील.
 
विद्यार्थी अनुत्तीर्ण होण्याची संभाव्य कारणे
व्याकरणाकडे दुर्लक्ष: अनेक विद्यार्थी मराठी विषयाला 'सोपा' समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. शुद्धलेखन, व्याकरण (विरामचिन्हे, समास, प्रयोग) यामध्ये होणाऱ्या चुकांमुळे गुण कमी होतात.
 
वाचनाचा अभाव: सोशल मीडिया आणि डिजिटल युगामुळे विद्यार्थ्यांमधील अवांतर वाचनाची सवय कमी झाली आहे. परिणामी, शब्दसंपत्ती मर्यादित झाली आहे.
 
इंग्रजी माध्यमाचा प्रभाव: सेमी-इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी विषयाचा सराव कमी पडतो. बोलताना मराठी वापरली जात असली, तरी साहित्यिक किंवा प्रमाण भाषा लिहिताना त्यांना अडचणी येतात.
 
लेखनाचा सराव नसणे: उत्तरपत्रिकेत मोठे उत्तरे किंवा निबंध लिहिताना विचारांची मांडणी कशी करावी, यामध्ये विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो.
 
यावर उपाय काय असू शकतात?
१. वाचन संस्कृती जोपासणे: शाळा आणि पालकांनी मुलांना अवांतर मराठी पुस्तके वाचण्यासाठी प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.
२. व्याकरणावर भर: प्राथमिक स्तरापासूनच मराठी व्याकरणाचा पाया पक्का करणे गरजेचे आहे.
३. लेखन सराव: दररोज किमान एक परिच्छेद शुद्धलेखन किंवा स्वतःच्या विचाराने लिहिण्याचा सराव केल्यास फायदा होऊ शकतो.
ALSO READ: बंगालमध्ये आता खऱ्या विकासाला सुरुवात होईल! कोलकात्यात दाखल झालेल्या एकनाथ शिंदे यांनी डबल-इंजिन सरकारवर विश्वास व्यक्त केला
Edited by-Dhanashri Naik

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईसाठी २२ जुलैपर्यंत यलो अलर्ट जारी

महाराष्ट्रात २० जुलै रोजी डॉक्टर संपावर जाणार

रशियाचा कीववर मोठा हल्ला: डझनभर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन डागण्यात आले

फेसबुक डाऊन: लॉगिन समस्या, वेबसाइट बंद

माकडांच्या एका टोळीने राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यात प्रवेश करून बाल्कनीत गोंधळ घातला

पुढील लेख
Show comments