Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बागेश्वर बाबांचे नागपुरात वादग्रस्त विधान

Updated: शनिवार, 25 एप्रिल 2026 (12:44 IST)
ALSO READ: 'आप'मधून भाजपमध्ये गेलेल्या राज्यसभा खासदारांवर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया
धीरेंद्र कृष्णशास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल एक वादग्रस्त दावा केला आहे. 
 
धीरेंद्र कृष्णशास्त्री (बागेश्वर बाबा), यांनी  कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अशी वक्तव्ये केली, जी महाराष्ट्रातील जनतेला "धक्कादायक" आणि अपमानकारक वाटली. बाबांनी दावा केला की, शिवाजी महाराज युद्धाला कंटाळले आणि त्यांनी आपले राज्य समर्थ रामदास स्वामींना सोपवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
बाबा म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून खूप थकले होते. त्यांना वाटले की आता पुरे झाले. ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले, आपला मुकुट काढून त्यांच्या चरणी ठेवला. महाराज म्हणाले, "कृपया आता माझ्यावर कृपा करा. मला आता आणखी लढायचे नाही. तुम्ही या राज्याची जबाबदारी घ्या; माझ्यात आता चालायचीही शक्ती उरलेली नाही. मला विश्रांतीची गरज आहे, मला आरामाची गरज आहे."
 
धीरेंद्र शास्त्री इथेच थांबले नाहीत. त्यांनी पुढे ती कथा सांगत सांगितले की, जेव्हा महाराजांनी विश्रांती घेण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा समर्थ रामदास स्वामी हसले आणि त्यांनी विचारले, "शिष्याचे कर्तव्य काय असते?" महाराजांनी उत्तर दिले, "गुरूंची आज्ञा पाळणे." त्यानंतर स्वामींनी तोच मुकुट महाराजांच्या डोक्यावर परत ठेवला आणि म्हणाले, "राज्य माझे आहे, पण तुम्हाला राज्य करायचे आहे."
 
इतिहासकार आणि जनतेमध्ये संताप
बागेश्वर बाबांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहे. तज्ज्ञ आणि इतिहासकारांच्या मते, शिवाजी महाराज कधीही 'थकवा' किंवा 'विश्रांती' याबद्दल बोलणारे नव्हते. ते मृत्यूपर्यंत स्वराज्यासाठी लढले. बाबांनी त्यांना 'थकलेले' आणि 'पराभूत' म्हणून चित्रित करणे हा त्यांच्या अदम्य धैर्याचा अपमान आहे. 
ALSO READ: शायना एनसी यांनी अमित ठाकरे यांच्या 'रस्त्यावर सडेतोड उत्तर' या वक्तव्यावर टीका केली; म्हणाल्या-तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था हातात घेण्याची गरज नाही
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द: आरबीआयने बंद करण्याचे आदेश जारी केले, ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: पंढरपूर पुनर्वसन धोरणाला फडणवीस मंत्रिमंडळाची मंजुरी

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

पुढील लेख
Show comments