Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ब्राम्हण बिझनेस नेटवर्क ग्लोबल बी.बी.एन.जी. ची राष्ट्रीय परिषद २ फेब्रुवारी रोजी ठाणे येथे

Updated: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (13:50 IST)
 
ठाणे (प.) मधील आर. नेस्ट बँक्वेट येथे आयोजित या एक दिवसीय परिषदेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्या हस्ते सकाळी ९.३० वाजता होणार असून याप्रसंगी भाजपा उद्योग आघाडी महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रदिप पेशकार, पितांबरीचे रविंद्र प्रभू देसाई, अतुल कुलकर्णी व विवेक देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. त्यानंतर दिवसभर चालणा-या विविध सत्रांमध्ये अविनाश धर्माधिकारी हे व्यवसाय हीच देशसेवा, चंद्रशेखर टिळक हे बदलती बाजारपेठ व व्यावसायिक, मृगांतक परांजपे हे जागतिक बाजारपेठेतील संधी, संजय ढवळीकर हे एनपीएचा चक्रव्यूह कसा भेदाल व शिवानंद अप्पाराज हे हॉस्पिटल मधील व्यवसाय संधी यावर उपस्थित उद्योजकांना मार्गदशन करतील. त्यानंतर महिला उद्योजकांचे चर्चासत्र होईल यामध्ये उद्योजिका वैशाली भट, नेहा कांदळगावकर व शरयू देशमुख या सहभागी होतील. दरम्यान बी २ बी सत्राचेही आयोजन करण्यात आले असून यामध्ये कॅमलिन, पितांबरी, अशोका बिल्डकॉन, चितळे डेअरी, चाणक्य मंडळ या व अनेक नामांकिंत कंपन्या सहभागी होणार आहेत समारोपाच्या सत्रामध्ये उद्योजक प्रसन्न पटवर्धन व अजित +मराठे यांच्या हस्ते प्रतिथयश उद्योजकांचा ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्काराने गौरव करण्यात येईल. परिषद यशस्वी होण्यासाठी मुकुंद कुलकर्णी, विराज लोमटे, राजेंद्र बेडेकर, मधुरा कुंभेजकर व निखिलेश सोमण आदी सदस्य प्रयत्नशील आहे. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: सातारा आणि पंढरपूरमध्ये माजी सैनिकांसाठी अत्याधुनिक सुविधा संकुले उभारली जाणार

अत्यंत पौष्टिक आणि जमिनीचा सुपीकपणा वाढवणारे पीक; वाल लागवड

माजी सैनिकांसाठी सातारा आणि पंढरपूरमध्ये अत्याधुनिक सुविधा उभारल्या जातील-शंभूराज देसाई

विद्यार्थ्यांवर गोळीबार झाला, सरकारने गृहमंत्री हटवावेत, राहुल गांधी पत्रकार परिषदेत गरजले

तुकाराम मुंढे यांचा ऐतिहासिक निर्णय; शाळांच्या ५० मीटर परिसरात आता शीतपेये, वडा पाव, बर्गर आणि आईस्क्रीमवर बंदी!

पुढील लेख
Show comments