Marathi Biodata Maker

रेस अराउंड ऑस्ट्रिया पूर्ण करणाऱ्या भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांचे जंगी स्वागत

शनिवार, 19 ऑगस्ट 2017 (13:14 IST)

रेस पूर्ण करणारे पहिलेच भारतीय बनण्याचा मिळवलाय मान

नाशिकचे सायकलीस्ट लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू आणि दर्शन दुबे यांनी रेस अराउंड ऑस्ट्रिया ही युरोपातील सर्वात अवघड अशी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांचे नाशिक सायकलीस्ट शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. रेस अराउंड ऑस्ट्रिया ही स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय असून नाशिकच्या शिरपेचात अजून एक तुरा खोवला आहे.

पाथर्डी फाटा येथील शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करत त्यांचे आशीर्वाद पन्नू आणि दुबे यांनी स्वागतचा स्वीकार केला. यावेळी नाशिक सायकलीस्टचे शैलेश राजहंस, नाना फड, डॉ. मनीषा रौंदळ, डॉ. नितीन रौंदळ आणि पन्नू आणि दुबे यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी त्याना पुढील वाटचालीसाठी सदिच्छा देण्यात आल्या.


लेफ्टनंट कर्नल भारत पन्नू हे नाशिक आर्टीलरीच्या स्पेस सेंटरमध्ये एरोनॉटीकल इंजिनिअर असून ब्रेवेट उपक्रमातून त्यांनी रॅन्डोनर सायकलीस्ट आहेत. तर सुपर रॅन्डोनर सायकलीस्ट असलेले दर्शन दुबे हे मूळ नाशिकचे असून नोकरी निमित्ताने ते बंगळूरू येथे असतात.

'टीम इंस्पायर इंडिया'चे भारत आणि दर्शन यांनी जगभरातील सर्वोत्तम अल्ट्रा सायकलिस्ट्सशी स्पर्धा करत २२०० किमीची शर्यत पूर्ण केली आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी ११७ तासांची वेळ असताना 'टीम इंस्पायर इंडिया'ने केवळ १०० तासात स्पर्धा पूर्ण केली. केवळ ८ महिन्याच्या प्रशिक्षण आणि सरावाच्या बळावर या जोडीने हे यश मिळवले आहे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

आले लागवड: अद्रक शेतीतून हमखास बंपर नफा मिळवण्याची संपूर्ण माहिती

India vs Ireland : भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी आयर्लंड संघ जाहीर

वाशिममध्ये तरुणाला जेवणासाठी बोलावून आर्थिक वादातून हत्या; चार आरोपींना अटक

पाणीटंचाईवर मुंबई उच्च न्यायालयाची कठोर भूमिका; सरकारला तीव्र शब्दांत फटकारले

पुढील लेख
Show comments