महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने ४ ते ८ डिसेंबर दरम्यान नागपूर-मुंबई आणि अमरावती-मुंबई दरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ALSO READ: मुंबई विमानतळावर बनावट पासपोर्टसह नेपाळी महिलेला अटक मिळालेल्या माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी वाढत्या प्रवाशांच्या संख्येमुळे, मध्य रेल्वे नागपूर-मुंबई, मुंबई-नागपूर आणि अमरावती-मुंबई मार्गांवर विशेष अनारक्षित गाड्या चालवेल. प्रवाशांना सुविधा देण्यासाठी या गाड्या मर्यादित कालावधीसाठी धावतील. तसेच ४ आणि ५ डिसेंबर रोजी नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे चार विशेष गाड्या धावतील. या गाड्यांचे प्रमुख थांबे अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंबा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर असतील. ALSO READ: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्यातील अग्निशमन दलाच्या वाहनाने दुचाकीला दिली धडक; महिलेचा मृत्यू तर पती आणि मुलींची प्रकृती गंभीर ६ ते ८ डिसेंबर दरम्यान मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून नागपूरला जाणाऱ्या गाड्या धावतील. या गाड्या दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंबा, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी स्थानकांवर थांबतील. तसेच अमरावती आणि मुंबई दरम्यान देखील गाड्या धावतील. या गाड्यांसाठी बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि दादर हे थांबे आहे. सर्व विशेष गाड्यांमध्ये १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन गार्ड ब्रेक व्हॅन असतील. ALSO READ: ब्राह्मण मुलींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या IAS अधिकारी संतोष वर्मा यांचा चेहऱ्याला काळे फासणाऱ्यला ५१,००० रुपयांचे बक्षीस जाहीर; ब्राह्मण संघटनांनी केला निषेध Edited By- Dhanashri Naik