Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा

Updated: सोमवार, 17 मार्च 2025 (16:57 IST)
ALSO READ: औरंगजेबाच्या कबरवरून राजकारण तीव्र, पोलिसांनी सुरक्षा कडेकोट केली
ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आपल्या देशातील आवडता देवांच्या मंदिराला भेट देऊ शकतो. त्यांनी देश आणि धर्मासाठी लढून स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनाशिवाय कोणत्याही देवतेचे दर्शन पूर्ण होत नाही.
ALSO READ: हर्षवर्धन सपकाळांचे मुख्यमंत्री फडणवीसांबाबत वादग्रस्त विधान, महायुतीने केली कारवाईची मागणी
केंद्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवला आहे. या मध्ये संगमेश्वर राजवाड्याचा देखील समावेश आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे यांना विश्वासघाताने ताब्यात घेतले होते. या किल्ल्याचा ताबा राज्य सरकार घेऊन त्याचा विकास करणार आहे. 

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण चालणार नाही. जर असे कोणी केले तर त्यांच्यासाठी कडक इशारा आहे. त्याला सोडणार नाही. 
ALSO READ: VHP आणि बजरंग दलाच्या मागण्यांवर रामदास आठवले म्हणाले 'औरंगजेबाची कबर काढून टाकण्याचा काही फायदा नाही'
सध्या राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण तापले आहे. बजरंगदल आणि विश्वहिंदू परिषद आक्रमक झाले असून राज्यातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. या साठी विहिंप आणि बजरंगदलच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हादंडाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या कबरी जवळ कोणी जाऊ नये या साठी त्याच्या भोवती पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit
 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: मुंबईच्या प्रतिष्ठित एअर इंडिया बिल्डिंगमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांचे नवीन कार्यालय असणार

UNESCO च्या जागतिक वारसा यादीत २५ नवीन स्थळांचा समावेश, ज्यात एका प्रसिद्ध भारतीय स्थळाचाही समावेश

१ ऑगस्टपासून तत्काळ तिकीट बुक करण्याची प्रक्रिया बदलणार! प्रवास करण्यापूर्वी नवीन नियमांविषयी जाणून घ्या....

दुसऱ्यांच्या शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळू शकतो का?

नागपूर मध्य भारताचे रेल्वे केंद्र बनले, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत माहिती दिली

पुढील लेख
Show comments