Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दादा भुसे ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या भेटीला ; दोघांत तासभर चर्चा..!

Updated: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (20:26 IST)
 
पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर येथील ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतली आहे. बंद दाराआड दादा भुसे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली आहे. त्यांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट कशासाठी आणि का असावी याचे वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत.
 
सिन्नर अपघातातील जखमींची विचारपूस करून दादा भुसे थेट राजाभाऊ वाजे यांच्याकडे दाखल झाले होते. आज सिन्नर येथे झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू तर १८ ते २० जण जखमी झाले आहेत. दरम्याननाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी लगेचच राजाभाऊ वाजे यांच्याकडे प्रस्थान केले.
 
दरम्यान बंद दारा आड दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी ? राजाभाऊ वाजे शिंदे गटात जाणार का ? दादा भुसे यांच्या सिन्नर मधील डिनर डिप्लोमसी मागे हेतू काय ? याकडे लक्ष लागून आहे.
 
ठाकरे गटाला धक्के पे धक्का असे धक्कातंत्र वापरण्यास शिंदे गट यशस्वी ठरला. ठाकरे गटाच्या अनेक विश्वासू नेत्यांनी त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागली आहे. कालच माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माजी मंत्री आणि माजी आमदार घोलप पिता पुत्र यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे त्यांच्याच मुलीने शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारीचे ग्रीन सिग्नल दिले. अशात आज पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या झालेल्या भेटीमागे काय दडलं आहे..? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात आता डिजिटल पेमेंट

मुंबईत पाण्याच्या टाकीवरून पडून एका बीएमसी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या लष्करी अधिकाऱ्याला अटक

5 रुपये खर्चल्यामुळे आईने चिमुकल्याला दिले चटके

काँग्रेस नेत्याची दिवसाढवळ्या हत्या , आरोपीला चकमकीत अटक

पुढील लेख
Show comments