Marathi Biodata Maker

दादा भुसे ठाकरे गटाच्या माजी आमदाराच्या भेटीला ; दोघांत तासभर चर्चा..!

Updated: शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (20:26 IST)
 
पालकमंत्री दादा भुसे यांनी सिन्नर येथील ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची भेट घेतली आहे. बंद दाराआड दादा भुसे आणि माजी आमदार राजाभाऊ वाजे या दोघांमध्ये जवळपास तासभर चर्चा देखील झाली आहे. त्यांमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. ही भेट कशासाठी आणि का असावी याचे वेगवेगळे तर्क वितर्क लढविले जात आहेत.
 
सिन्नर अपघातातील जखमींची विचारपूस करून दादा भुसे थेट राजाभाऊ वाजे यांच्याकडे दाखल झाले होते. आज सिन्नर येथे झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू तर १८ ते २० जण जखमी झाले आहेत. दरम्याननाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे आणि मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख तर जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी लगेचच राजाभाऊ वाजे यांच्याकडे प्रस्थान केले.
 
दरम्यान बंद दारा आड दोघांमध्ये तासभर चर्चा झाली असून दोघांमध्ये काय चर्चा झाली असावी ? राजाभाऊ वाजे शिंदे गटात जाणार का ? दादा भुसे यांच्या सिन्नर मधील डिनर डिप्लोमसी मागे हेतू काय ? याकडे लक्ष लागून आहे.
 
ठाकरे गटाला धक्के पे धक्का असे धक्कातंत्र वापरण्यास शिंदे गट यशस्वी ठरला. ठाकरे गटाच्या अनेक विश्वासू नेत्यांनी त्यांच्यासोबत पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाला गळती लागली आहे. कालच माजी मंत्री बबन घोलप यांची कन्या तनुजा घोलप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. माजी मंत्री आणि माजी आमदार घोलप पिता पुत्र यांच्या शिंदे गटातील प्रवेशाची चर्चा सुरू असतांना दुसरीकडे त्यांच्याच मुलीने शिंदे गटात प्रवेश करण्याची तयारीचे ग्रीन सिग्नल दिले. अशात आज पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या झालेल्या भेटीमागे काय दडलं आहे..? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Edited By-Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी प्रवाशांना दिलासा, मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

LIVE: आषाढी एकादशीच्या दिवशी मध्य रेल्वे मिरज-दादर एकमार्गी विशेष ट्रेन चालवणार

आता तुम्ही मोबाईल नेटवर्कप्रमाणे तुमची वीज कंपनी निवडू शकता; सरकारने एक नवीन योजना तयार केली

भारतातील रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा, डब्यांमधील सुरक्षा व्यवस्थाही कडक केली जाणार

नीट पेपरफुटी वादाच्या पार्श्वभूमीवर, शिक्षण मंत्रालयाने एनटीएच्या ४७ अधिकाऱ्यांवर कारवाई केली

पुढील लेख
Show comments