Dharma Sangrah

राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवा - धनंजय मुंडे

गुरूवार, 31 मे 2018 (15:11 IST)
- विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केली मागणी
 
राज्यातील हजारो शेतकऱ्यांचा लाखो क्विंटल हरभरा खरेदी अभावी नोंदणी करूनही पडून​​ आहे. त्यामुळे राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याचा हरभरा खरेदी होईपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवावीत अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेयांनी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली.
 
मागील दोन ते तीन महिन्यापासून केंद्र सुरू असूनही हरभरा खरेदी सुरु नव्हती, हरभऱ्याला बारदानाही उपलब्ध नव्हता त्यामुळे शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही. हजारो शेतकऱ्यांनी हरभरा खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी केली होती मात्र शेतकऱ्यांच्या हरभऱ्याची खरेदी झाली नाही अशी माहिती धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.
 
खरेदी केंद्राच्या आवारात लाखो क्विंटल हरभरा पडून आहे, पावसाळा तोंडावर आहे त्यामुळे हरभऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तातडीने खरेदी केंद्र पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.
 
बाजारात हरभऱ्याला कमी भाव आहे अशात शेतकऱ्यांना खरेदी केंद्रांशिवाय पर्याय नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे त्याला तात्काळ मदत करावी असेही ते म्हणाले.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आम्ही याबाबतीत केंद्राला प्रस्ताव पाठवला असल्याचे सांगितले. यावेळी धनंजय मुंडे यांच्यासह आमदार जयवंत जाधव, आंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती गोविंद देशमुख उपस्थित होते.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

मुंबई पावसाने ठप्प! महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

महाराष्ट्र टीईटी परीक्षा पुढील वर्षापासून ऑनलाइन होणार, पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा विनाशुल्क होणार

LIVE: ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३०० कुटुंबांना नवीन घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या

एसटी बसेसना तोटा होत राहिल्यास नोकऱ्या जातील! प्रताप सरनाईक यांनी आळशी अधिकाऱ्यांना अल्टिमेटम दिला

पंढरपूर विकास योजना: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय, विठ्ठल नगरीचा कायापालट करणार!

पुढील लेख
Show comments