Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

धुळे जिल्ह्यात लंपी आजाराचा शिरकाव, अडीच महिन्यात 'इतक्या' जनावरांना लागण, तर 35 जनावरांचा मृत्यू

Updated: मंगळवार, 10 ऑक्टोबर 2023 (08:17 IST)
 
धुळे जिल्ह्यात सलग दुसऱ्या वर्षी लम्पी संसर्गजन्य आजाराने धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील चारही तालुक्यात तब्बल 52 गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झाला आहे. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे. तसेच तब्बल 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली असून 896 जनावरे लम्पिच्या विळख्यातून बरे झाले आहेत.
 
गोवंशात आढळणाऱ्या लम्पी या आजाराने मागील वर्षी धुमाकूळ घातला होता. त्यानंतर लसीकरणाची प्रक्रिया वेगाने राबविण्यात आल्यानंतर ही साथ नियंत्रणात आली होती. मात्र यावर्षी पुन्हा लंपीने डोके वर काढले असून धुळे जिल्ह्यातील चारही तालुक्यात तब्बल 52 गावांमध्ये लम्पीचा शिरकाव झाला असून आत्तापर्यंत 35 जनावरांचा मृत्यू झाला आहे, तर 1 हजार 353 जनावरांना याची लागण झाली आहे, जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवंश जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यासाठी आठवडे बाजार देखील बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यातील आठवडे बाजारात गोवंशय जनावरे विक्रीसाठी आणण्यात येत असून त्यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
 
गेल्या वर्षी नियंत्रणात असलेल्या लम्पी या आजाराने पुन्हा डोके वर काढले आहे. या वर्षी सद्यस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे बाधित जनावरांपासून संसर्ग होवून चांगली, सुदृढ जनावरांना बाधा होऊ नये किंवा एकत्रित सार्वजनिक ठिकणी आणू नयेत. बाधित जनावरांचे विलगीकरण करावे.  असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केले आहे. मात्र लम्पी या आजाराने पशुधन दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

रत्नागिरी आणि सातारा यांना जोडणाऱ्या रघुवीर घाटात भूस्खलन! एसटी बस अडकली; १५-२० गावांचा संपर्क तुटला

Old Monk Dispute ओल्ड मॉन्कला 'रम' म्हणून विकता येणार नाही? बॉम्बे हायकोर्टात '७ वर्षे जुनी' असल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह

भारतीय महिला संघाने आशिया कप २०२६ मध्ये हाँगकाँगवर १३७ धावांनी विजय मिळवला

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना ५ सप्टेंबर रोजी खेळला जाईल; किती वाजता सुरु होईल! येथे पहा

LIVE: महाराष्ट्रामध्ये रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी 'सेवानिवृत्ती सन्मान योजना' सुरू करण्यात आली

पुढील लेख