Marathi Biodata Maker

महाराष्ट्रात EVM प्रकरण पुन्हा तापणार, राहुल गांधी-प्रियांका गांधी-केजरीवाल येणार एकत्र

सोमवार, 23 डिसेंबर 2024 (11:37 IST)
Maharashtra News: महाराष्ट्रात ईव्हीएममधील बिघाडाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. कारण लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मरकड वाडीला भेट देणार आहे.
ALSO READ: ‘अपूर्ण ज्ञान अधर्माला जन्म देते’, म्हणाले आरएसएस प्रमुख मोहन भागवत
मिळालेल्या माहितीनुसार याबाबत माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे 5 जानेवारीला मरकडवाडीत येणार आहे. त्यामुळे राहुल गांधी, प्रियांका आणि केजरीवाल 10 जानेवारीला मरकडवाडीत येण्याचा विचार करत आहे. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेसाठी 2024 च्या मतदानानंतर 23 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीला अनपेक्षित यश मिळाले. निकाल जाहीर झाल्यानंतर संपूर्ण राज्यात ईव्हीएमचा मुद्दा चर्चेत आला आहे. निवडणूक आयोगाच्या संगनमताने ईव्हीएममध्ये छेडछाड करून भाजपने निवडणुका जिंकल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहे.
 
याच्या निषेधार्थ संपूर्ण राज्यात विरोधकांकडून ईव्हीएमविरोधात आंदोलन सुरू आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मरकडवाडीच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी मरकडवाडीत जात आहे अशी माहिती समोर आली आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: लोकसभेने ६ खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

ठाकरे गटाला मोठा धक्का; लोकसभा सचिवालयाने सहा बंडखोर खासदारांच्या शिंदे गटातील विलीनीकरणाला मंजुरी दिली

शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना मोठा धक्का, मुंबई उच्च न्यायालयाने जामीन रद्द केला

महाराष्ट्रात वार्षिक कृषी हॅकेथॉनचे आयोजन होणार, विजेत्यांना अजित पवार यांच्या नावाने २५ लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे

भाषण नाही, मुलाखती नाहीत… सुप्रिया सुळे पुढील तीन दिवस शांत राहणार; कारण जाणून घ्या

पुढील लेख
Show comments