यातील प्रथम घटना मालेगाव तालुक्यातील निंबळके गावात घडली आहे. फक्त २१ वर्षीय तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारी आणि नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केली आहे. राकेश शेवाळे (21) असं या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
तर दुसरी घटना मालेगाव तालुक्यातच घडली असून, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 25 वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वाके गावात ही घटना घडली. मनोज शांताराम सावंत असं 25 वर्षीय शेतकऱ्यांचं नाव आहे. शेततळ्याच्या पाण्यात उडी घेऊन मनोज सावंत यांनी आत्महत्या केली