Dharma Sangrah

शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज मिळणार

बुधवार, 14 जून 2017 (17:19 IST)
शेतकऱ्यांना कमी दरात पीककर्ज देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आता 2 टक्के सबसिडी आणि वेळेवर कर्ज भरल्यास 3 टक्के सवलत, अशी एकूण पाच टक्के रक्कम सरकार भरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के दराने कर्ज उपलब्ध होणार आहे. शेतकऱ्यांना पीककर्ज 9 टक्के दराने दिले जाते. मुद्दल रक्कमेपेक्षा व्याजाचे ओझेच जास्त झाल्याने कर्जाची रक्कम वाढत जाते. मात्र एका वर्षासाठी घेतलेले कर्ज कमी दरात देण्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी सरकारच्या तिजोरीवर 19 हजार कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे.
 
दुसरीकडे राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख पीककर्ज अनुदान योजना 1990 सालापासून सुरु आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सरकारकडून 3 टक्के सबसिडी दिली जाते. एखाद्या शेतकऱ्याने 1 लाख रुपयांपर्यंत पीककर्ज घेतलं असेल, तर त्याला त्यावर सरकारकडून 3 टक्के सबसिडी दिली जाईल. 1 लाखांपेक्षा जास्त आणि 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज असेल तर 1 टक्के सबसिडी दिली जाईल. मात्र दरवर्षी 30 जूनपर्यंत कर्जाची परतफेड करणं अनिवार्य असेल. वेळेत कर्जाची परतफेड न करु शकल्यास सबसिडी मिळणार नाही.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

कॉकरोच जनता पार्टीचा आज दिल्लीत एल्गार

LIVE: विधान भवनात आता केवळ चेहऱ्यानेच प्रवेश, कागदी पास बंद

एनटीएची चूक: नागपूरच्या नीट विद्यार्थ्याला अबू धाबी केंद्र नेमण्यात आले; विद्यार्थ्याकडे पासपोर्ट नाही

नीट फेरपरीक्षा उद्या: परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्रांवर मॉक ड्रिल, नवीन नियम जाणून घ्या

पुण्यातील लोहगड किल्याच्या दरीत पडून 26 वर्षीय उद्योजक तरुणचा मृत्यू

पुढील लेख
Show comments