Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बिपरजॉय चक्रीवादळ कुठपर्यंत पोहोचलं?

Updated: शनिवार, 10 जून 2023 (23:15 IST)
 
पुणे वेधशाळेचे प्रमुख के.एस.होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,अत्यंत तीव्र चक्रीवादळ बिपरजॉय मुंबईपासून 630 किमी, तर पोरबंदरपासून 620 किमी अंतरावर आहे.
 
अरबी समुद्रात आलेले हे या वर्षातील पहिलं वादळ आहे. यापूर्वी बंगालच्या उपसागरात मोखा नावाचं वादळ निर्माण झालं होतं आणि नंतर त्याचंही तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं होतं.
 
दरम्यान, बिपरजॉय वादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, कोकण आणि गोवा किनारपट्टीलगतच्या भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
 
वादळ किती वेगानं पुढं सरकतंय?
6 जून रोजी समुद्रात निर्माण झालेलं हे वादळ झपाट्यानं पुढं सरकत आहे. ते अपेक्षेपेक्षा अधिक वेगानं धोकादायक होत चालल्याचं दिसत आहे. 7 तारखेला त्याचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर झालं.
 
8 तारखेच्या सकाळी, हे वादळ पोरबंदरपासून 965 किमी आणि मुंबईपासून 930 किमी अंतरावर होतं.
 
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आठ जूनच्या सकाळपर्यंत हे वादळ ताशी 40 किलोमीटर वेगानं पुढं सरकत आहे. असं असलं तरी त्याच्या प्रगतीचा दर सतत बदलत आहे. कधीकधी ते ताशी 3 किमी ते 9 किमी वेगानं पुढं जात आहे.
 
हवामान खात्यानुसार, हे वादळ सध्या समुद्रात पुढे सरकत असून ते आणखी उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. पण, ते नेमके कुठे धडकेल, याची कोणतीही माहिती हवामान विभागानं दिलेली नाही.
 
सध्या या वादळाच्या वाऱ्याचा वेग 150 ते 155 किमी प्रतितास झाला असून 9 जूनपर्यंत तो 170 किमी प्रतितास होण्याची शक्यता आहे.
 
अरबी समुद्राचे तापमान सध्या 30 ते 32 अंश सेल्सिअस आहे. त्यामुळे हे वादळ आणखी तीव्र होत असून 12 जूनपर्यंत ते तसंच राहण्याची शक्यता आहे.
 
महाराष्ट्रात हे वादळ कधी येणार?
हे वादळ कुठे धडकणार याबाबत हवामान खात्याने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.
दरम्यान, 11 जूनच्या आसपास परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अहवालानुसार, मान्सूनपूर्व तयार होणारी चक्रीवादळे त्यांचा मार्ग बदलू शकतात. तसंच या वादळाचा नेमका मार्ग आधीच ठरवणं फार कठीण काम आहे.
 
हे वादळ 12 तास थेट उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
 


Published By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

मुंबईकरांनो लक्ष द्या! २७ सप्टेंबरपर्यंत या वस्तू आपल्याजवळ ठेवू नका, अन्यथा पोलीस कारवाई होईल

छत्रपति संभाजीनगर मध्ये वाळूने भरलेल्या ट्रकखाली चिरडून ८ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments