Marathi Biodata Maker

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन; रायगडाच्या पायथ्याशी भव्य सोहळ्याचे आयोजन

Updated: सोमवार, 9 मार्च 2026 (09:26 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी (मनसे) आजचा दिवस म्हणजेच ९ मार्च २०२६ अत्यंत ऐतिहासिक आहे. पक्षाच्या स्थापनेला आज २० वर्षे पूर्ण होत असून, या निमित्ताने राज ठाकरे यांनी रायगडाच्या पायथ्याशी भव्य सोहळ्याचे आयोजन केले आहे.
ALSO READ: महाराष्ट्रातील शाळांमधील मुलींना लाठी आणि कराटे प्रशिक्षण दिले जाईल; योजना जून २०२६ मध्ये सुरू होणार
मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी यावेळचा वर्धापन दिन मुंबईऐवजी किल्ले रायगडाच्या सानिध्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला. सकाळी त्यांनी सहकाऱ्यांसह गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले. त्यानंतर रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी वाडी येथे मुख्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

तसेच या २० व्या वर्धापन दिनाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्षाची नवी सदस्य नोंदणी मोहीम.
संपूर्ण महाराष्ट्रभर मनसेची सदस्य नोंदणी सुरू होत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका लक्षात घेता, तरुणांना मोठ्या संख्येने पक्षाशी जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी होणाऱ्या मुख्य सभेत राज ठाकरे कार्यकर्त्यांना संबोधित करतील.

पक्षाचा २० वर्षांचा प्रवास
९ मार्च २००६ रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवरून सुरू झालेला हा प्रवास आज २० व्या वर्षात पदार्पण करत आहे.
२००९ चा सुवर्णकाळ: जेव्हा मनसेचे १३ आमदार निवडून आले होते.
नाशिक महापालिका: मनसेची सत्ता असलेल्या नाशिकमधील विकासकामांची आजही चर्चा होते.
बदलती भूमिका: 'मराठी कार्ड' पासून 'हिंदुत्वा'पर्यंत झालेला पक्षाचा प्रवास या २० वर्षांतील सर्वात मोठा बदल मानला जातो.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसे कार्यकर्ते रायगड परिसरात दाखल झाले आहे. "नवे ध्येय, नवा झेंडा" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे. या सोहळ्यामुळे रायगड परिसरातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे.
ALSO READ: Nagpur Blast : नागपूरच्या राऊळगाव स्फोट प्रकरणातील मृतांचा आकडा २२ वर पोहोचला
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

पालघर पुरात एकाचा मृत्यू, १६ गावांचा संपर्क तुटला, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट जारी

IND vs SL Youth Test: भारताने श्रीलंकेला २११ धावांनी पराभूत करून युवा कसोटी मालिका जिंकली

२०२६ च्या राष्ट्रकुल खेळांच्या सुरुवातीपूर्वीच भारताची लव्हलिना उपांत्य फेरीत पोहोचली

थायलंडमधील दक्षिण प्रांतात सुरक्षा चौकीवर हल्ला, पाच सैनिक ठार

अण्णा हजारे यांचे विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ दोन तासांचे मौन आंदोलन झाले

पुढील लेख
Show comments