Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्र, गोवा तसेच दक्षिणेत पाऊस घटणार

Updated: शनिवार, 29 जुलै 2023 (07:34 IST)
 
बंगालच्या उपसागरात लागोपाठ निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे गेले दोन आठवडे राज्याला पावसाने झोडपले आहे. गुरुवारीही विदर्भ, कोकण गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हय़ांत रेड तसेच ऑरेंज अलर्ट होता. या पावसाने जुलै महिन्याचीही सरासरी ओलांडली असून, अनेक भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची वेळ आली आहे. दरम्यान, येत्या 24 तासांनंतर या पावसाचा जोर कमी होणार असून, शनिवारपासून अनेक भागांत तुरळक पावसाचा यलो अलर्ट आहे.
 
सध्या बंगालच्या उपसागरात ओरिसा व आंध्र किनारपट्टीजवळ असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे. पंजाब व लगतच्या भागावर हवेची द्रोणीय स्थिती आहे. कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाल्याने महाराष्ट्रातील पाऊसही ओसरणार आहे.
 
शुक्रवारी ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
 
ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, गोंदिया भंडारा
 
शनिवार ऑरेंज अलर्ट
 
पुणे, रायगड
 
रविवार ऑरेंज अलर्ट
 
कुठेच नाही
 
देशभरात सरासरीच्या अधिक पाऊस
दरम्यान, दमदार पावसामुळे देशभरातील पावसाची तूट भरुन निघाली असून, सरासरीच्या 5 टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. पूर्व तसेच पूर्वोत्तर भारतातील काही राज्ये वगळता देशातील इतर राज्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे.
 
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकात आबादानी
जुलै महिन्याच्या पावसाने महिना संपायच्या आधीच सरासरी ओलांडली असून, महाराष्ट्रात अतिरिक्त सरासरीच्या 56 टक्के अधिक, गोव्यात अतिवृष्टी सरासरीच्या 92 टक्के अधिक, तसेच कर्नाटकात अतिवृष्टी होत सरासरीज्च्या 63 टक्के अधिक पाऊस झाला आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

एअर इंडियाची मोठी घोषणा, मुंबई-टोरोंटो थेट विमानसेवा २५ ऑक्टोबरपासून सुरू होणार

LIVE: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसने सोडले टीकास्त्र , राष्ट्रवादी काँग्रेसने दिले प्रत्युत्तर

सीएसएमटी आणि सावंतवाडी दरम्यान नवीन नियमित रेल्वेगाडी धावणार

सिद्धिविनायक मंदिरातील १८ कोटी रुपयांची देणगी चोरीचा राज ठाकरेंच्या दाव्यावर राज्य सरकार सक्रिय मोड मध्ये

पुढील लेख
Show comments