Marathi Biodata Maker

रूपनवर यांच्या पेन्शनसंदर्भातील विधेयकावर निर्णय नाही!

Updated: सोमवार, 24 एप्रिल 2017 (09:40 IST)
 
नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेसचे आमदार रामहरी रुपनवर यांनी विधान परिषदेत हे अशासकीय विधेयक मांडले. त्यात त्यांनी असे म्हटले आहे, राज्यात शेतकरी, कारागीर, भूमिहीन यांना कोणतेही वेतन मिळत नाही. सर्वसामान्य नागरिकांसाठी ते आयुष्यभर काम करतात. वयाची साठ वर्षे झाल्यानंतर त्यांना कोणतेही आर्थिक लाभाचे साधन उपलब्ध नाही. एखाद्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर निवृत्तिवेतन मिळते. आमदारांना निवृत्तिवेतन मिळते. इतर क्षेत्रात ग्रॅज्युईटी, निवृत्तिवेतन दिले जाते. पण शेतकरी, कारागीर, भूमिहीन समाजाच्या उपयोगी पडतात. समाजाची सातत्याने सेवा करतात. त्यांच्या जीवनाच्या उदरनिर्वाहासाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही. कायद्याने तरतूद होऊन सरकारमार्फत अनुदान किंवा निवृत्तिवेतन मिळावे यासाठी मी हे विधेयक मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर तालिका सभापतींनी हे विधेयक मांडण्यास संमती दिल्यानंतर रुपनवर यांनी हे विधेयक विधान परिषदेत मांडले. सभागृहात त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, अथवा सरकारने त्याला कोणतेही उत्तर दिलेले नाही. 
 
विधानसभा आणि विधान परिषदेतील प्रत्येक सदस्याला अशासकीय विधेयक अथवा ठराव मांडण्याचा अधिकार आहे. किंबहुना तो त्यांचा हक्क आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या कालावधीत प्रत्येक शुक्रवारी आलटून, पालटून अशासकीय ठराव आणि विधेयके मांडली जातात. त्यावर चर्चा होऊन सरकारकडून उत्तर दिले जाते. त्यानुसार रुपनवर यांनी मांडलेल्या विधेयकावरही पुढील अधिवेशनात चर्चा होऊन सरकारकडून त्याला उत्तर दिले जाईल, असे अपेक्षित आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर शेतकऱ्यांना निवृत्तिवेतन मिळणार असा प्रचार, प्रसिद्धी करणारे रुपनवर यांचे हे अशासकीय विधेयक आहे, तो सरकारचा निर्णय नाही. मात्र, हे समजून न घेताच हा सरकारी निर्णय असल्याचा चुकीचा प्रचार सोशल मीडियावर सुरू आहे. 
 
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी 7 डिसेंबर 1990 रोजी अशाच प्रकारचा अशासकीय ठराव विधानसभेत मांडला होता. याद्वारे त्यांनी शेतकऱ्यांना दरमहा निवृत्तिवेतन देण्यात यावे अशी मागणी केली होती.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: रोहित पवार यांनी तुकाराम मुंडे यांना निवेदन देत परीक्षा रद्द करण्याची आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली

भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका कधी सुरू होईल? संपूर्ण वेळापत्रक पहा

किसान कर्जमुक्ती योजना २०२६ च्या लाभार्थ्यांची यादी जाहीर, भंडारा जिल्ह्यातील २२,३६५ शेतकरी पात्र

दिल्ली आणि महाराष्ट्रासह १८ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळणार; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

रोहित पवार यांचे तुकाराम मुंडे यांना निवेदन; पेपरफुटीची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments