suvichar

राष्ट्रवादी काँग्रेसवर ग्रामीण जनतेचा विश्वास...

शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (14:54 IST)
गुरुवारी राज्यभरातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांचे निकाल जाहीर झाले. या निकालांनुसार ग्रामीण भागातील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर पुन्हा एकदा विश्वास टाकला आहे. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा नंबर दोनचा पक्ष ठरला आहे. पंचायत समित्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पुणे जिल्ह्यात ७८ जागा मिळाल्या आहेत तर साताऱ्यात ७६, बीडमध्ये ५१, उस्मानाबादेत ५१, अशा एकूण ६७४ जागा मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदांच्या निकालानुसार पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला ४४, साताऱ्यात ३९, उस्मानाबादेत २६, बीडमध्ये २५, अशा एकूण ३६० जागी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळाले आहे.
 
राज्यात झालेल्या निवडणुकांच्या निकालाचे अवलोकन करुन पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीने कार्य करेल. तसेच पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रीय काँग्रेस व समविचारी पक्ष यांच्या सहकार्याने एकत्रितपणे काम करेल, असे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक  यांनी सांगितले आहे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

केतन अग्रवाल हत्याकांडानंतर, राष्ट्रीय पुरुष आयोगाच्या स्थापनेची मागणी तीव्र झाली

LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले पत्र

मुसळधार पावसाचा हवामान विभागाने जिल्ह्यात ४ आणि ५ जुलै रोजी रेड अलर्ट जाहीर केला

नागपूरमध्ये काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी भाजप-आरएसएसवर मंदिरातील देणग्या लुटल्याचा गंभीर आरोप केला

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे शिवसेनेच्या या दोन खासदारांना मंत्रीपदे मिळणार

पुढील लेख
Show comments