Dharma Sangrah

परीक्षा संपताच शाळांना सुट्टी

Updated: गुरूवार, 31 मार्च 2022 (15:46 IST)
 
या पूर्वी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात आणि तोपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात असे फर्मान शिक्षण विभागाने काढले होते. पण त्यावर शिक्षण आयुक्तांनी आता नव्या सूचना दिल्या आहेत. अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असल्यास तसेच शाळांनी परीक्षांचे नियोजन केले असल्यास त्या घेण्यासाठी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत थांबण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शाळांसमोरील संभ्रम दूर झाला असून आता परीक्षा संपताच विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुटीचा मार्ग मोकळा होणार आहे.
 
गेल्या शुक्रवारी शिक्षण विभागाद्वारे काढलेल्या परिपत्रकात उन्हाळ्यातही शाळा सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. या परिपत्रकात शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण करून एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात परीक्षा घ्याव्यात तसेच 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात. गरज पडल्यास शनिवारी, रविवारीही शाळा सुरू ठेवाव्यात, असे नमूद केले गेले होते. मात्र यापूर्वीच परीक्षांचे नियोजन केलेल्या शाळांचा या निर्णयामुळे गोंधळ उडाला होता. एप्रिलमध्ये पहिल्या दोन आठवड्यात परीक्षांचे आयोजन केलेल्या शाळांनी परीक्षा पुढे ढकलायच्या का असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र आता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. परीक्षांचे नियोजन बदलण्याची गरज नसल्याचे सांगितले गेले आहे.

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: सर्व मागण्या मान्य होऊनही जरांगे यांचे अविरत आंदोलन सुरूच! भुजबळांचा मोठा खुलासा

सर्व मागण्या मान्य होऊनही, जरांगे यांचे अविरत आंदोलन सुरूच! मंत्री नाराज असल्याचे सांगत भुजबळ यांनी मोठा खुलासा केला

आदित्य ठाकरे यांनी सीबीआयच्या एफआयआरवर प्रतिक्रिया दिली; दिशा सालियनबद्दल म्हणाले....

अनंत अंबानींनी वचन पूर्ण केले, रिलायन्स फाऊंडेशनकडून तिरुमलासाठी २५ इलेक्ट्रिक खास बसेस

पटियाला आणि पुण्यातील कॉल सेंटर्समार्फत अमेरिकेत फसवणूक; ६६ फोन, १३ लॅपटॉप आणि हार्ड डिस्क जप्त

पुढील लेख
Show comments