Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वीज पुरवठा खंडित होण्याचे महावितरणने दिले हे कारण…

Updated: शुक्रवार, 10 जून 2022 (21:30 IST)
 
दरवर्षी महावितरणकडून मान्सूनपूर्व आगमनाअगोदर विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची कार्ये केली जातात, यामध्ये विद्युत वाहिन्या, रोहित्र व इतर यंत्रणा उघड्यावर असल्याने विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडाच्या फांद्या काढण्यासह वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्ती यासह नियोजन करून इतर महत्वाची कामे केली जातात.

जेणेकरून पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही. मात्र तरीसुद्धा फांद्या छाटताना झाडावरील संपूर्ण फांद्या काढता येत नाही. त्यामुळे जोरदार हवेच्या दाबामुळे लगतच्या फांद्या, मांज्याचे धागे व इतर साहित्य विद्युत यंत्रणेला अडथळा आणीत असतात. त्यासोबतच उन्हाळ्यातील वाढत्या तापमानामुळे वीजवाहक यंत्रणेवर बसविण्यात आलेल्या पिन इन्सुलेटर आणि डिस्क इन्सुलेटरवर पहिल्याच पावसाचे पाणी पडल्याने ते पंक्चर होऊन वीजपुरवठा बाधित होतो. विजेचा संभाव्य अपघात टाळण्यासाठी आपत्कालीन यंत्रणा(ब्रेकर) कार्यंनवित होतात व वीजप्रवाह खंडित होतो. याशिवाय वृक्ष, झाडाच्या फांद्या वीजवाहक तारांवर पडल्याने व वाऱ्यामुळे वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा बंद होत असतो. त्यामुळे फौल्ट शोधण्यासाठी व बंद झालेला पुरवठा सुरु करण्यासाठी यंत्रणा सातत्याने कार्यरत असते.
 
पहिल्याच पावसाने काल जिल्ह्यात व शहरात वीजयंत्रणेवर आघात केला. यामध्ये त्यामुळे १९ उपकेंद्रे, ३३ व ११ केव्हीच्या ९१ वाहिन्यां आणि १७८९ रोहित्रे बंद पडली त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज यंत्रणा सुरळीत करण्यासाठी महावितरणने सर्व ठिकाणी आपली यंत्रणा ठेवली होती. वाऱ्यासह सुरू असलेल्या या पावसात फॉल्ट शोधून तो दुरुस्त करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व कंत्राटदाराचे कामगार यांनी प्रयत्न सुरु केले. पावसाचा वेग ओसरताच गुरुवारी रात्री शहरातील व आज जिल्ह्यातील उर्वरित वीज पुरवठा पूर्ववत केला.
 
महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, नाशिक मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कार्यकारी अभियंते आणि अभियंते, जनमित्र, कंत्राटी कर्मचारी यांनी सातत्याने अहोरात्र कार्य करीत वीज पुरवठा पूर्ववत केला आहे. वा-यासह आलेल्या पाऊसामुळे जर आपल्या परिसरात इलेक्ट्रिक खांब कोसळला, वीज वाहिनी तुटल्यास किंवा रोहित्र जळाल्यास महावितरणच्या टोल फ्री नंबर १८००२३३३४३५ / १८००१०२३४३५ / १९१२ यावर तसेच आपात्कालीन परिस्थितीत तात्काळ संबंधित महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

गणेशोत्सवात मंडपात 'महाप्रसाद' वाटण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागू शकते

ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत झालेल्या संघर्षानंतर मुंबईच्या परळ भागात तणाव

महाराष्ट्रात H1N1 इन्फ्लूएंझाचा प्रादुर्भाव वाढला; १,१०९ रुग्णांची नोंद, त्यापैकी ६५% रुग्ण पुणे आणि मुंबईतील

Central Railway Updates: टिटवाळा स्थानकावर २८ ऑगस्टपासून १५ दिवसांचा 'मेगा ब्लॉक'; अनेक लोकल गाड्या रद्द होणार

नेपाळमधील पुरामुळे हत्ती वाहून भारतात आले; त्यांची अवस्था पाहून लोकांचे मन हेलावले

पुढील लेख
Show comments