Dharma Sangrah

मालाड येथील दुर्घटनेला जबाबदार कोण? आ. विद्या चव्हाण यांचा सवाल

रात्री झालेल्या मुसळधार पावसात मुंबईतील मालाड भागात भिंत कोसळून सुमारे १८ जण मृत्युमुखी पडले तर कित्येक जण जखमी झाले आहेत. तसेच अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी व्यक्त केली. गेली २० वर्ष हा विभाग पालिकेच्या अखत्यारित येतो. मात्र, झोपड्पट्टीधारकांना कुठल्याच सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. पाणी पुरवठा, वीज, पक्की घरे यापासून येथील झोपडीधारक वंचित असल्याचे विद्या चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले.
 
मुंबई महानगरपालिकेने वेळीच नाले, गटारे यांची व्यवस्था केली असती तर आज अशी दुर्दैवी वेळ ओढवली नसती. वन विभाग आणि पालिका यांच्यातच ताळमेळ नसल्याने पावसाळ्याआधी हाती घेतलेली कामे रखडलेल्या अवस्थेत आहेत, असा आरोप त्यांनी केला. पालिकेच्या हलगर्जीपणावर ताशेरे ओढताना विद्या चव्हाण म्हणाल्या की, एकीकडे मुंबईला स्मार्ट सिटी बनविण्याची स्वप्ने दाखवतात आणि दुसरीकडे ६५ लाख झोपड्पट्टीधारक अशा भीषण परिस्थितीत जीव धोक्यात घेऊन राहात आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दुर्घटना बाधित झोपड्पट्टीधारकांना घरे उपलबध करून द्यावीत आणि त्यांचे लवकरात लवकर पुनर्वसन करावे, अशी मागणी विद्या चव्हाण यांनी केली.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

आई, मला माफ कर... "पुढच्या जन्मी मी तुझ्याच पोटी जन्म घेईन," म्हणत नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली

पुण्यात तिहेरी हत्याकांड; एकाच घरात आई आणि दोन मुलांचे मृतदेह आढळले

शेतकरी पेन्शन योजना: फक्त ५५ रुपयांच्या गुंतवणुकीवर महिना ३,००० रुपये पेन्शन

मुंबईत पावसादरम्यान झाडांखाली उभे राहू नका! बीएमसीचा नागरिकांना महत्त्वाचा इशारा

मुंबई लोकल ट्रेन हत्या प्रकरण: मयंक लोहारच्या कुटुंबीयांचा आरोपीला फाशी देण्याची मागणी

पुढील लेख
Show comments