Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पावसाने ठप्प! महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

Updated: सोमवार, 29 जून 2026 (21:02 IST)
ALSO READ: पंढरपूर विकास योजना: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय, विठ्ठल नगरीचा कायापालट करणार!
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई आणि आसपासच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.  
 
तसेच किनारपट्टीच्या भागात ताशी ४० ते ५० किमी वेगाचे सोसाट्याचे वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मच्छिमारांनाही आजपासून २ जुलैपर्यंत समुद्रात न जाण्याचा सक्त सल्ला देण्यात आला आहे.
 
विदर्भ: अमरावतीत ऑरेंज अलर्ट आणि इतर जिल्ह्यांमध्ये इशारा
विदर्भ प्रदेशातही मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ताशी ४०-५० किमी वेगाच्या सोसाट्याच्या वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. बुलढाणा आणि अकोला येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.
 
मध्य महाराष्ट्र: पुणे आणि नाशिकमध्ये सुखद हवामानाची शक्यता
पुणे, नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार यांसारख्या मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही आज बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
मराठवाडा: मेघगर्जनेसह मध्यम पाऊस
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेडसह मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्येही आज हवामान सक्रिय राहील. आजपासून सुरू होणाऱ्या पावसामुळे महाराष्ट्रातील तापमानात हळूहळू ३ ते ५ अंश सेल्सिअसची घट होईल, ज्यामुळे दमटपणा आणि उष्णतेपासून दिलासा मिळेल. 
ALSO READ: महाराष्ट्र टीईटी परीक्षा पुढील वर्षापासून ऑनलाइन होणार, पेपरफुटीनंतर फेरपरीक्षा विनाशुल्क होणार
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी फडणवीस सरकारला मुदत दिली; मागण्या पूर्ण न झाल्यास २९ तारखेपासून उपोषण सुरू करणार

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाच आउटलेट्सना फटका! एफडीएने परवाने निलंबित केले

India vs Afghanistan : भारत विरुद्ध अफगाणिस्तान टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर

भारत विरुद्ध श्रीलंका सामना तिसऱ्या दिवशी लवकर सुरू होणार! किती वाजता सुरु होईल जाणून घ्या

पुढील लेख
Show comments