Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Nanad Bhavjay Relationship नणंद- वहिनी यांच्यातील नाते कमकुवत करतात या चुका

Updated: बुधवार, 26 नोव्हेंबर 2025 (13:05 IST)
 
नाते कधी कमकुवत होते?
लग्नानंतर तुमच्या नणंदेला कधीही असे वाटू नये की तिच्या भावावर तुमचा एकटाच अधिकार आहे. वर्षानुवर्षांचे नाते अचानक बदलू शकत नाही. म्हणून तुमच्या पतीला तुमच्या नणंदेसोबत जास्त वेळ घालवण्यापासून किंवा तिच्याशी बोलण्यापासून कधीही रोखू नका. तिला तिच्या भावासोबत वेळ घालवण्याची, तिच्याशी चांगले वागण्याची आणि मजामस्तीमध्ये सहभागी होण्याची संधी द्या. यावरून तुम्ही तुमच्या नात्याचा किती आदर करता हे दिसून येते.
 
तसेच नणंदेला हे कळायला हवे की घरातील नवीन सदस्य म्हणून वहिनीचे आपले खाजगी आयुष्य असते. नणंदेने तिच्या आणि तिच्या भावाच्या वैयक्तिक आयुष्यात, त्यांच्या निर्णयांमध्ये किंवा त्यांच्या मुलांच्या संगोपनात अनावश्यक हस्तक्षेप केल्यास हे नाते बिघडते. प्रत्येकाच्या जागेचा आदर न करणे ही मोठी चूक ठरते.
 
तक्रार करणे
लग्नानंतर लगेचच तुमच्या नणंदेच्या आईवडिलांबद्दल किंवा भावाबद्दल तिच्याकडे तक्रार करू नका. यामुळे तुमची प्रतिमा खराब होऊ शकते. तुम्हाला काही गैरसोय होत असली तरी, तुमच्या नणंदेकडे तक्रार करू नका; ती नेहमीच तिच्या आईवडिलांची किंवा भावाची बाजू घेईल. यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होऊ शकते. जर तुम्हाला काही समस्या असतील तर तुमच्या पतीशी बोला. थोडा वेळ घ्या. संयमाने गोष्टी सुटू शकतात.
 
तसेच नणंदेने वहिनीच्या घरातील काम करण्याच्या पद्धतीवर, तिच्या स्वयंपाकावर, तिच्या कपड्यांवर किंवा नोकरीवर सतत आणि उघडपणे टीका करणे टाळावे.
 
लगेच बदल घडेल हा विचार
नवीन सुनेने जुने नियम एकाच वेळी बदलू नका. प्रत्येक कुटुंबाचे स्वतःचे नियम आणि परंपरा असतात. म्हणून लग्नानंतर लगेचच तुम्हाला आवडेल म्हणून जुना नियम बदलण्याचा प्रयत्न करू नका.
 
तसेच नणंदेने आमच्या घरात असे चालत नाही, किंवा तुझ्या माहेरच्या पद्धती इथे आणू नकोस, असे बोलून वहिनीला दुय्यम आणि अपरिचित असल्याची जाणीव करून देणे टाळावे. सतत दुसऱ्याच्या चुका शोधणे किंवा न्यायनिवाडा करत राहणे हे नात्यात कटुता निर्माण करते.
 
तिसऱ्या व्यक्तीचे ऐकून गैरसमज वाढवणे
शेजारी, नातेवाईक किंवा कुटुंबातील इतर सदस्यांनी केलेल्या नकारात्मक आणि द्वेषपूर्ण गोष्टींवर (चुगली) सहज विश्वास ठेवू नये. गैरसमज झाल्यास एकमेकींशी थेट न बोलता मनात शंका ठेवणे किंवा इतर कुटुंबातील सदस्यांकडे तक्रारी करणे टाळावे. यामुळे मूळ समस्या सुटत नाही, उलट गैरसमज बळावतात.
 
एकमेकींना स्पर्धक म्हणून पाहणे
वहिनी आल्यामुळे नणंदेला तिचा भावावरील हक्क कमी झाल्यासारखे वाटणे. यामुळे ती नकळतपणे वहिनीला स्पर्धा म्हणून पाहू लागते आणि तिच्याशी वाद घालते. नणंदेने स्वतःला घरातील अधिक अनुभवी किंवा श्रेष्ठ मानून वहिनीवर आपले मत, नियम किंवा इच्छा लादण्याचा प्रयत्न करु नये. यामुळे वहिनीला घरात मोकळेपणा वाटणार नाही. उलट वहिनी जेव्हा नवीन घरात येते किंवा तिला काही समस्या असते, तेव्हा नणंदेने तिला भावनिक आधार द्यावा, तिच्या भावनांची कदर न करणे आणि तिच्या अडचणी समजून न घेणे योग्य ठरणार नाही.
 
या चुका टाळून परस्पर आदर, थेट आणि मोकळा संवाद आणि एकमेकांच्या मतांना महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

Colorful Coconut Rolls रक्षाबंधनाला बाजारातून आणण्यापेक्षा घरीच बनवा 'रंगीबेरंगी मिठाई'

Raksha Bandhan 2026 Wishes for Sister in Marathi बहिणीसाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

Raksha Bandhan Wishes for Brother in Marathi 2026 भावासाठी रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

मधुमेह असताना लोणचे, पापड आणि चटणी खाणे योग्य का?

हॉटेल इंडस्ट्रीत करिअर करायचे आहे? फूड प्रोडक्शन कोर्स ठरेल फायदेशीर!

पुढील लेख
Show comments