Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोहित शर्मा, विराट कोहली आणि जडेजाची जागा घेऊ शकतात 'हे' तरुण चेहरे

Updated: सोमवार, 1 जुलै 2024 (14:45 IST)
 
रोहित म्हणाला, "हा माझाही शेवटचा सामना होता. क्रिकेटच्या या फॉरमॅटचा निरोप घेण्यासाठी यापेक्षा चांगली वेळ असू शकत नाही. मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. करिअरची सुरुवातही मी या फॉरमॅटपासूनच केली होती. मला कप जिंकायचा होता आणि सर्वांचे आभार मानायचे होते."
 
संपूर्ण स्पर्धेत रोहितनं स्वतः कामगिरी करून दाखवत संघासमोर कायम उदाहरण ठेवण्याचा प्रयत्न केला.
 
विराट कोहली या स्पर्धेत बहुतांश सामन्यात फॉर्मसाठी झगडताना दिसला. तर रोहित शर्मानं 156 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 257 धावा केल्या.
 
स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला. रोहितनं सुपर-8 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि सेमीफायनलमध्ये इंग्लंडच्या विरोधात अर्धशतकी खेळी केली होती.
 
जडेजानं इन्स्टाग्रामवर केली घोषणा
या ऐतिहासिक विजयानंतर दुसऱ्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजानंही विराट आणि रोहित प्रमाणं टी-20 मधून निवृत्तीची घोषणा केली. 35 वर्षीय जडेजानं इन्स्टाग्रामवर पोस्ट केली.
 
रवींद्रने लिहिलं, “कृतज्ञ मनासह मी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटचा निरोप घेतो. अभिमानानं पुढं सरसावणाऱ्या एखाद्या घोड्यासारखी मी सातत्यानं चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. इतर फॉरमॅटमध्ये मी खेळत राहणार आहे.”
 
पण या वर्ल्ड कपमध्ये जडेजाची कामगिरी फारशी चांगली राहिली नाही.
 
रोहित शर्माचे योगदान
रोहित शर्मा टी-20 मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून या फॉरमॅटमधून निवृत्ती घेत आहे.
 
रोहितनं 159 सामन्यांत पाच शतकांसह 4231 धावा केल्या आहेत. त्यात 32.05 ची सरासरी आणि 140.89 चा स्ट्राईक रेट होता.
 
2007 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारतानं पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी रोहित शर्मानं त्या स्पर्धेत टी-20 करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर आता त्यानं जगज्जेता बनूनच निवृत्ती जाहीर केली आहे.
 
रोहित शर्मानं त्यानंतर झालेला प्रत्येक टी-20 वर्ल्ड कप खेळला आहे. त्याच्या शिवाय आतापर्यंत फक्त एका क्रिकेटपटूनं सर्व टी-20 वर्ल्ड कप खेळले आहेत. तो म्हणजे बांगलादेशचा शाकिब अल हसन.
 
कोहलीचे योगदान
विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त होत आहे.
 
कोहलीनं वर्ल्ड कपच्या 35 सामन्यांत 58.72 च्या सरासरीनं आणि 128.81 च्या स्ट्राइक रेटनं 1292 धावा केल्या आहेत.
 
कोहलीनं भारतासाठी 125 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 48.69 च्या सरासरीनं 137.04 च्या स्ट्राइक रेटनं 4188 धावा केल्या आहेत. विराट या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा रोहितनंतरचा दुसरा फलंदाजही ठरला आहे. कोहलीनं एक शतक आणि 38 अर्धशतकं केली आहेत.
 
कोहलीनं 2010 मध्ये झिम्बाब्वेच्या विरोधात टी-20 करिअरची सुरुवात केली होती.
 
जडेजाची कामगिरी
36 वर्षांच्या रवींद्र जडेजाची या विश्वचषकात फारशी चमकदार कामगिरी झालेली नाही.
 
पण 2009 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात करिअरची सुरुवात करणाऱ्या जडेजानं 74 सामन्यांत 127.16 च्या स्ट्राइक रेटने 515 धावा केल्या आणि 7.13 च्या इकॉनॉमीनं 54 विकेट घेतल्या आहेत.
 
कर्णधारपदी कुणाची वर्णी?
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघाचे कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. रोहित शर्मानं 62 सामन्यांत भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. त्यापैकी 49 सामन्यांत विजय मिळाला तर फक्त 12 सामन्यांत संघाचा पराभव झाला.
 
तर विराट कोहलीनं 50 सामन्यांत नेतृत्व केलं. त्यापैकी 30 सामन्यांत संघाला विजय मिळाला तर 16 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. त्यांच्यासारखी क्षमता इतर कुणाकडं आहे?
 
अनेक सीरिजमध्ये संघाचं नेतृत्व केलेला आणि वर्ल्ड कपमध्ये रोहितला उपकर्णधार म्हणून साथ दिलेला हार्दिक पांड्या कर्णधार पदासाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
 
ऋषभ पंतनंही तो उत्तम कर्णधार असल्याचं आयपीएलमध्ये सिद्ध केलं आहे. संघ व्यवस्थापनानं मात्र झिम्बाब्वे विरोधातील आगामी मालिकेत संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शुभमन गिलकडं सोपवली आहे.
 
रोहित शर्मा आणि विराट कोहली या वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामन्यात सलामीला उतरले. त्यांची जागा आता शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड घेऊ शकतात.
 
शुभमन गिलचा दावा
गेल्या वर्ल्ड कपमध्ये शुभमन गिलनं रोहित शर्माच्या साथीनं डावाची सुरुवात केली होती. टॉप ऑर्डरमध्ये भारताकडं असलेला तो एक उत्तम पर्याय आहे.
 
बॅकफूटवर चांगले फटके खेळण्याची आणि गॅप शोधण्याची क्षमता असलेला 24 वर्षीय गिल तांत्रिकदृष्ट्या सक्षम क्रिकेटपटू आहे. तसंच त्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये संयमही दिसून येतो.
 
झिम्बाब्वे दौऱ्यात त्याच्याकडं फलंदाजी आणि नेतृत्व दोन्ही सिद्ध करण्याची संधी आहे. निवडकर्त्यांनी कर्णधारपद देत तो दीर्घकालीन पर्याय असल्याचं दाखवून दिलं आहे. वीरेंद्र सेहवागनं पांड्याऐवजी गिलकडंच कर्णधारपद द्यावं असं म्हटलं आहे.
 
सगळ्या नजरा यशस्वीवर
गेल्या एका वर्षात या तगड्या फलंदाजानं सलामीला खेळताना चांगली कामगिरी केली आहे. वेगानं धावा करण्यासाठी यशस्वीला ओळखलं जातं.
 
त्यानं वेस्टइंडीजपासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत वेगवेगळ्या स्थितींमध्ये उत्तमोत्तम कामगिरी केली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक संघ डाव्या आणि उजव्या हाताच्या फलंदाजाच्या कॉम्बिनेशच्या शोधात असतो. आतापर्यंत फक्त 16 आंतरराष्ट्रीय इनिंग्जमध्ये त्यानं एक शतक ठोकलं आहे.
 
ऋतुराजही स्पर्धेत
सलामीच्या फलंदाजांच्या गर्दीमध्ये ऋतुराज गायकवाडनं त्याचं अस्तित्व टिकवून ठेवलं आहे. उजव्या हातानं फलंदाजी करणारा ऋतुराज गेल्या काही वर्षांत कायम संघात किंवा आसपास दिसला आहे.
 
संयमी खेळीनं सुरुवात करणारा ऋतुराज एकदा जम बसल्यानंतर मात्र गोलंदाजांना चांगलाच घाम गाळायला लावतो. ऋतुराजकडेही झिम्बाब्वेच्या दौऱ्यात त्याची क्षमता सिद्ध करण्याची संधी आहे.
 
2018 मध्ये अंडर-19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य असलेल्या अभिषेक शर्माचं आक्रमक फलंदाजीसाठी कौतुक झालं आहे. या वर्षी आयपीएलमध्येही तो चांगलाच चर्चेत होता.
 
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडच्या साथीनं सलामीला स्फोटक फलंदाजी करत त्यानं 16 सामन्यांत 204.21 च्या जोरदार स्ट्राइक रेटनं 484 धावा केल्या.
 
तिसऱ्या क्रमांकावर कोण खेळणार?
आतापर्यंत तर बहुतांश वेळा तिसऱ्या क्रमांकावर कोहलीनंच फलंदाजी केली आहे. पण आधुनिक क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाजाची ही जागा कशी भरून काढणार? हाच सर्वात मोठा प्रश्न आहे.
 
कोहलीच्या रुपानं भारतीय क्रिकेट टीमला एक स्टार फलंदाज, उत्तम क्षेत्ररक्षक आणि अनुभवाचा खजाना असलेला क्रिकेटर मिळाला होता.
 
त्यामुळं तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत संघाला मजबुती देणाऱ्या अशाच खेळाडूचा शोध टीम मॅनेजमेंटला घ्यावा लागेल. वरील चार पर्यायांपैकी एक जण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
 
Published By- Dhanashri Naik 
 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

भारताचे माजी खेळाडू विनय कुमार याची कर्नाटक संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती

श्रीलंकेत क्रिकेट सामन्यादरम्यान पाण्यावरून दोन खेळाडूंमध्ये वाद; प्रशिक्षकाचा मृत्यू

भारत आणि अफगाणिस्तान सप्टेंबरमध्ये तीन सामन्यांची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार

Sri Lanka vs India: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गॉलमध्ये दाखल झाला; खेळाडूंचे भव्य स्वागत

AFG In ODI WC : अफगाणिस्तानने आयर्लंडला तीन गडी राखून पराभूत केले, विश्वचषक स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली

पुढील लेख
Show comments