Marathi Biodata Maker

2021 मध्ये भारतीय खेळाडूंनी केले खास रेकॉर्ड

सोमवार, 20 डिसेंबर 2021 (15:26 IST)
2021 चा शेवट जरी भारतीय संघासाठी फारसा चांगला नसला तरी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाने अनेक मोठ्या गोष्टी केल्या. टी-20 विश्वचषक आणि कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताला यावर्षीचा सर्वात मोठा पराभव झाला. नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीतही पोहोचू शकला नाही, तर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीतही पराभव पत्करावा लागला, या पराभवानंतरही यंदा भारतीय संघाने काही आश्चर्यकारक गोष्टी केल्या आहेत. तर जाणून घ्या भारतीय संघ आणि भारतीय खेळाडूंनी 2021 मध्ये केलेल्या 5 सर्वात मोठ्या विक्रमांबद्दल - 

ऑस्ट्रेलियात 2 कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ
यावर्षी भारताने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी मालिका जिंकून दणका दिला. जानेवारीमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने गाबा आणि ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मालिका जिंकण्याचा चमत्कार केला. यापूर्वी, भारतीय संघाने 2018-19 मध्येही ऑस्ट्रेलियन भूमीवर कसोटी मालिका जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर दोन कसोटी मालिका जिंकणारा भारत हा पहिला आशियाई देश ठरला आहे.
 
अश्विनने हरभजन सिंगचा विक्रम मोडला
अश्विनने भज्जीचा कसोटीतील विक्रम मोडला. हरभजनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 417 विकेट घेतल्या. आता अश्विनने 427 कसोटी विकेट घेतल्या आहेत. अश्विन भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनपेक्षा फक्त कुंबळेनेच स्पिनर म्हणून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. कुंबळेने कसोटीत 619 विकेट घेतल्या आहेत.
 
अक्षर पटेलने इतिहास रचला
भारतीय फिरकीपटू अक्षर पटेल हा पहिला फिरकी गोलंदाज ठरला आहे ज्याच्या नावावर पहिल्या 5 कसोटी सामन्यात सर्वाधिक 5 बळी घेण्याचा विक्रम आहे. पटेलने आतापर्यंत 5 कसोटी सामन्यांमध्ये 5 वेळा 5 बळी घेण्याचा विक्रम केला आहे, जो भारतीय विक्रम आहे. त्याने नरेंद्र हिरवाणी आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन यांचे रेकॉर्ड तोडले आहेत.
 
रोहित शर्मा T20I मध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू ठरला
यंदा रोहितने दणका दिला. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक 50 पेक्षा जास्त धावा करणारा खेळाडू ठरला आहे. रोहितने टी-20 मध्ये 30 वेळा ही अप्रतिम कामगिरी केली आहे. हिट मॅनने कोहलीचा विक्रम मोडला आणि हा पराक्रम आपल्या नावावर केला. कोहलीने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 29 वेळा हा पराक्रम केला आहे.
 
T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा करणारा कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला
यावर्षी कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये मोठी कामगिरी केली आहे. IPL दरम्यान कोहलीने T20 क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण केल्या. T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी 10,000 धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

Father's day 2026 wishes from son in law in Marathi 2026 जावयाकडून सासऱ्यांसाठी फादर्स डेच्या शुभेच्छा

LIVE: मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी

प्रणित मोरे वाद प्रकरणी महाराष्ट्र सरकारची कठोर कारवाई, दिले हे आदेश

मुंबई विमानतळाला बॉम्बची आणखी एक धमकी, पोलीस आणि बीडीडीएस पथकांना सतर्क केले

कोका अभयारण्याच्या बफर झोनमध्ये ५ वर्षांच्या नर अस्वलाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments