Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

काश्मीर : प्रेमपत्र, मोडलेली लग्न आणि संपर्काच्या नव्या क्लुप्त्या

Updated: गुरूवार, 12 सप्टेंबर 2019 (11:17 IST)
 
"मी लोकांची घरं शोधून काढली, त्यांचं दार ठोठावलं आणि त्यांना माझ्या फोनवरचा संदेश दाखवला. बहुतेक सगळ्या चांगल्या बातम्या होत्या."
 
काही भावनिक क्षणही होते. चंदीगडमध्ये राहणाऱ्या एका कॉलेज तरुणाने आपण परीक्षेत दुसरा क्रमांक आल्याचा निरोप त्याच्या आई-वडिलांना पाठवला होता. "त्याच्या आईने मला मिठी मारून रडायला सुरुवात केली," सायेद सांगतात.
"तू ही माझ्या मुलासारखा आहेस," त्या महिलेने सायेद यांना सांगितलं.
 
संपर्कासाठीची सगळी साधनं बंद झाल्याने जुन्या सवयींना उजाळा मिळतोय. काश्मीरमध्ये आता लोक पुन्हा पत्रं लिहायली लागली आहेत.
 
प्रेमाची अशीही पत्र
26 वर्षांच्या इरफान अहमदचं श्रीनगरमध्ये त्याच्याच गल्लीत राहणाऱ्या विद्यापीठात शिकणाऱ्या मुलीवर प्रेम आहे. एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी आणि कधी भेटायचं हे ठरवण्यासाठी त्यांनी आता पत्र लिहून कागदाचे बोळे करून एकमेकांच्या घरात फेकायला सुरुवात केलीय. चुरगळलेल्या या कागदांमध्ये प्रेम, हुरहूर आणि काळजी असते.
 
"सगळं बंद झाल्याने आम्हाला फोनवर बोलता येत नाही, भेटता येत नाही. म्हणून आम्ही पत्रं लिहायला सुरुवात केली," ऑफिस रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारे अहमद सांगतात.
 
"आम्ही एकमेकांची आठवण येत असल्याचं सांगतो, हे सगळं किती क्रूर आहे त्याबद्दल बोलतो. मग मी उत्तर लिहिलतो. कागद चुरगळतो आणि तिच्या बेडरूममध्ये फेकतो. आम्ही असं बरेचदा करतो."
 
लोकांनी लँडलाईनचा वापर करणं खरंतर सोडू दिलं होतं, पण आता या परिस्थितीमुळे लोक पुन्हा एकदा लँडलाईन फोन वापरायला लागले आहेत.
 
भारतामध्ये 10 कोटींपेक्षा जास्त मोबाईल फोन युजर्स आहेत तर 560 दशलक्ष इंटरनेट युजर्स आहेत. जगातल्या सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डिजिटल मार्केट्सपैकी एक भारत आहे. त्या तुलनेत लँडलाईन फोन्सची संख्या फक्त 23 दशलक्ष आहे.
 
पण आता काश्मिरमध्ये लोक नवीन लँडलाईन कनेक्शनसाठी अर्ज करत आहेत किंवा मग वापरात नसलेला फोन दुरुस्त करायचा प्रयत्न करतायत.
 
काश्मिरमध्ये सलग दुसऱ्या महिन्यात बंदसारखी स्थिती आहे. आणि आता अनेक लँडलाईन फोन पुन्हा वापरात आले आहेत. पण फोन 'सुरू' असले तरी त्यावरून संपर्क होत नसल्याचं लोकांचं म्हणणं आहे.
 
प्लास्टिकचं एक टेबल, काही खुर्च्या आणि सुरू असणारा चायनीज बनावटीचा फोन असे तात्पुरते फोन बूथ सुरक्षा यंत्रणांनी रस्त्यावर उभारले आहेत.
अशाच एका फोनबूथवर आलेल्या मंझूर अहमद यांची अडचण ही या बंदीचा लोकांवर आणि त्यांच्या आयुष्यावर कसा परिणाम झालाय हे सांगणारी आहे.
 
मोफत कॉलची सुविधा
55 वर्षांच्या मंझूर अहमद यांचा शालींचा व्यवसाय आहे. त्यांचे पैसे देणं लागत असणाऱ्या काश्मीर बाहेरच्या त्यांच्या ग्राहकांशी संपर्क करण्याच्या ते प्रयत्नात आहेत.
 
"त्यांनी मला चेक्स पाठवले. मी बँकेत गेलो (काही बँका सुरू आहेत) पण त्यांनी सांगितलं की कनेक्टिविटी नसल्याने त्यांना पेमेंट प्रोसेस करता येणार नाही. म्हणून मी आता शहरभर फिरून फोन शोधतोय. म्हणजे फोन करून मला ग्राहकांना पैसे ट्रान्सफर करायला सांगता येईल," ते म्हणतात.
 
एका खोलीतल्या ऑफिसमध्ये ट्रॅव्हल एजन्सी चालवणाऱ्या यास्मिन मसरत या आता लोकांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत. श्रीनगरच्या काही भागांमध्ये फोनलाईन्स सुरू झाल्या आहेत.
 
यास्मिन यांच्या ऑफिसमधला फोनही सुरू झालाय. ऑगस्टच्या मध्यात त्यांनी शूरपणे त्यांचं ऑफिस उघडलं आणि तिथल्या एकमेव लँडलाईनवरून लोकांना त्या मोफत कॉल करू देतात.
फोन करायला येणाऱ्यांसाठी त्यांच्या ऑफिसच्या भिंतींवर सूचना आहेत "फोनवरचं संभाषण थोडक्यात आणि कामापुरतं ठेवा. आम्हाला या कॉलचे पैसे पडतात."
 
बघता बघता ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांची गर्दी झाली. 500 पेक्षा जास्त लोक फोन करायला आले आणि त्यानंतर जवळपास रोज 1000 मोफत कॉल्स करण्यात येत आहेत.
 
यामध्ये काही कॅन्सर पेशंट्स होते ज्यांना डॉक्टरशी किंवा इतर शहरांतल्या दुकानांशी प्रिस्क्रिप्शन आणि औषधांबद्दल बोलायचं होतं.
एक दिवस काळजीत पडलेली 8 वर्षांची एक मुलगी तिच्या आजीसोबत आली. मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या तिच्या आईशी तिला बोलायचं होतं. 20 दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. "तू बरी हो आणि लवकर परत ये," तिने आईला पुन्हापुन्हा सांगितलं.
 
"खोलीतले सगळेच भावुक झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी होतं," यास्मिन मसरत सांगतात.
 
एकदा एका माणसाने येऊन त्याच्या मुलाला आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी दिली.
 
आणि जर लँडलाईनमार्फतही निरोप पोहोचवता येत नसेल तेव्हा भारतात इतरत्र राहणारे काश्मिरी किंवा परदेशस्थ काश्मिरी स्थानिक न्यूज नेटवर्क्सच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत निरोप पोहचवत आहेत.
 
दिल्लीस्थित सॅटेलाईट आणि केबल न्यूज नेटवर्क असणाऱ्या गुलिस्तान न्यूजकडे असे अनेक संदेश आणि व्हीडिओ आले आहेत. बातम्यांमध्ये आणि बातम्यांदरम्यान हे संदेश पुन्हापुन्हा दाखवण्यात येतात. यामध्ये स्थानिक काश्मिरींनी पाठवलेले संदेशही असतात.
 
काश्मीरमधला हा खरंतर लग्नसराईचा मोसम. पण आतापर्यंत लग्न रद्द झाल्याचे शेकडो संदेश आपण दाखवल्याचं या नेटवर्कचं म्हणणं आहे. इंग्रजी आणि उर्दू बातम्यांमध्ये स्क्रोलद्वारे किंवा व्हीडिओ मेसेजद्वारे हे निरोप जाहीर करण्यात आले.
 
गेल्या आठवड्यातल्या एका सकाळी 26 वर्षांचा शोएब मीर या नेटवर्कच्या श्रीनगरच्या कार्यालयात एक वेगळीच मागणी करण्यासाठी आला होता. बेपत्ता वडिलांना शोधण्यासाठी त्याला नेटवर्कची मदत हवी होती.
श्रीनगरपासून 12 किलोमीटरवर असणाऱ्या बेमिनामधील हे 75 वर्षांचे गृहस्थ सकाळी फेरी मारायला बाहेर पडले ते परतलेच नाहीत. त्यांचा दूरवर शोध घेतल्यानंतर आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं मीर यांनी सांगितलं.
 
"रस्त्यांवर लोकं नाहीत. सारंकाही बंद आहे. आणि पोलीस या बंदाच्या व्यवस्थेत गर्क आहेत. कदाचित मी व्हीडिओद्वारे संदेश देत वडिलांचा फोटो दाखवला तर त्यांना शोधून काढायला मदत होईल," मीर सांगतात.
 
चॅनलने आतापर्यंत लोकांची मदत केली असली तरी त्यांनाही अडचणी येत आहेत. शटडाऊनचा स्थानिक मीडियावर मोठा परिणाम झाला आहे. बातम्या गोळा करणं कठीण झालंय.
 
श्रीनगरमधून न्यूज नेटवर्कचं कुरियर रोज दिल्लीला पाठवण्यात येतं. यामध्ये 16GBचे पाच पेन ड्राईव्ह असतात. यामध्ये बातम्या आणि फुटेज असतं. मग याचं एडिटिंग होतं आणि दिल्ली कार्यालयातून प्रक्षेपण केलं जातं.
 
स्थानिक वृत्तपत्रांच्या पानांची संख्या नेहमीच्या 16 ते 20 वरून घसरून 6 ते 8वर आली आहे. श्रीनगरमध्ये उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या मीडिया सेंटरमधल्या इंटरनेट कनेक्शन असणाऱ्या 10 डेस्कटॉपभोवती 200 पत्रकारांची गर्दी असते. इथूनच त्यांना ई-मेल वाचता येतात, बातम्या, फोटो आणि व्हीडिओ पाठवता येतात. वृत्तसंस्थांच्या बातम्या पेन ड्राईव्हवर डाऊनलोड करून वर्तमानपत्रांच्या ऑफिसमध्ये नेण्यात येतात आणि मग पानं भरण्यासाठी त्या वापरल्या जातात.
 
"ही संयमाची परीक्षा आहे. काल मला काही फोटोज पाठवायला सात तास लागले," एका छायाचित्रकाराने सांगितलं.
 
इंटरनेट शटडाऊन काश्मीरसाठी नवीन नाही. Internetshutdown.in या ट्रॅकरनुसार या भागामध्ये इंटरनेट बंद होण्याची या वर्षातली ही 51वी घटना आहे. 2011पासून आतापर्यंत 170पेक्षा जास्त वेळा शटडाऊन झालं. यामध्ये 2016मधल्या सहा महिन्यांच्या कालावधीचाही समावेश आहे जेव्हा बहुतेक काळासाठी इंटरनेट बंद होतं.
 
काश्मीर टाईम्सच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर अनुराधा भसिन यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे. माहितीचा प्रसार थांबवणं आणि पत्रकारांच्या हालचालींवर निर्बंध आणण्याला त्यांनी आव्हान दिलंय.
 
"हे मानवी हक्कांचं उल्लंघन असल्याचं" त्यांनी म्हटलंय. शटडाऊनमुळे मीडियाला घडामोडीचं वार्तांकन करता येत नसून इतर भारतीयांसाठी उपलब्ध असणारी माहिती काश्मिरींना मिळत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.
 
गेल्या तीन दशकांपासूनच्या दहशतवादाने पोखरून निघालेल्या या भागामध्ये हिंसाचार घडू नये म्हणून हा शटडाऊन गरजेचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. दहशतवाद्यांना चिथवून हिंसेसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप भारताने पाकिस्तानवर केलाय. पाकिस्तानने हा आरोप फेटाळून लावलाय.
 
"अतिरेक्यांचा त्यांच्या म्होरक्यांशी असलेल्या संपर्क तोडायचा पण दुसरीकडे इतरांसाठी इंटरनेट सुरू ठेवायचं. असं कसं करता येणार? मला जाणून घ्यायला आवडेल," भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर नुकतेच म्हणाले होते.
 
पण अशा प्रकारच्या शटडाऊनमुळे उलट अजून हिंसा होऊ शकते, असं संशोधनात आढळून आलं आहे.
 
स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या जॅन रिडझॅक यांनी नेटवर्क शटडाऊनमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला आहे. ते म्हणतात, "एकत्र येऊन होणाऱ्या हिंसाचाऱ्या घटनांचा याच्याशी अधिक प्रकर्षाने संबंध आहे."
 
माहिती मिळत नसल्याने "लोकांना काहीतरी पावलं उचलण्यासाठी एकत्र यावं लागतं. अहिंसक मार्गांनी निदर्शनं करण्यासाठी चांगली संपर्क यंत्रणा आणि नियोजन लागतं. म्हणून मग अहिंसक प्रतिक्रियांची जागा हिंसक प्रतिक्रिया घेतात."
 
काश्मीरचं भवितव्य अजूनही अनिश्चित आहे. संपर्क यंत्रणांवरची बंदी कधी उठवली जाणार किंवा शिथिल होणार हे अजूनही स्पष्ट नाही. पण तरीही काही आशेचे कण आहेत.
 
गेल्या आठवड्यात एका सकाळी श्रीनगरमधल्या न्यूज नेटवर्कच्या ऑफिसमधली फोनलाईन आश्चर्यकारकरित्या काम करू लागली. त्याबद्दल लहानसा जल्लोषही करण्यात आला. "कदाचित आता गोष्टी सुधारतील, आम्ही आशेवरच जगतोय," चीफ रिपोर्टर सय्यद रौफ सांगतात.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

पुढील लेख
Show comments