संबंधित माहिती
- गेली 30 वर्षं आम्ही हे ओझं वाहत होतो: शिवसेना
- अजित पवार यांना एसीबीनं दिलेली 'क्लीन चिट' कोर्टात टिकेल का?
- पाकिस्तान म्हणतं, हिंदूंची संख्या कमी झाली नसून वाढली
- Africa हून मुली भारतात आणून दिल्ली वेश्याव्यवसाय कशा प्रकारे आहे सुरू?
- CAA: दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शनं, अनेक ठिकाणी संचारबंदी
'बाळासाहेबांचे हिंदुत्व गुंडाळून शिवसेनेचे घूमजाव'
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला, त्यापायी मतदानाचा अधिकारही गमावला, मात्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्तेच्या राजकारणासाठी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला काळिमा फासला असून, हिंदुत्व खोटे ठरवले अशी खरमरीत टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली आहे.
घूमजाव म्हणजे उद्धव ठाकरे अशी आता व्याख्या झाली असून, देव,देश आणि धर्म यासाठी भाजपबरोबर लोकसभेलाही युती करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन करून मतदारांचा विश्वासघात केला असा टोला शेलार यांनी लगावला.
बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी प्रदीर्घ लढा दिला. मतदानाचा अधिकार गमावण्याची वेळ आली तेव्हा माझे एक मत गेले तरी चालेल पण करोडो हिंदू बांधव भरभरून मतं देतील अशी भूमिका घेतली. हिंदुत्वाच्या आधारे शिवसेनाप्रमुखांनी राजकारण करून यश मिळवलं. त्या भूमिकेला उद्धव ठाकरे यांनी घूमजाव करून खोटं ठरवलं आहे.