संबंधित माहिती
- Sahastrabahu jayanti सहस्रबाहू जयंती: सहस्रबाहू कोण होते? जाणून घ्या 10 तथ्ये
- Mahesh Navami 2022:माहेश्वरी समाजाचे पूर्वाजांना मिळाला होता शाप, जाणून घ्या कसा मिळाला मोक्ष?
- Meghalaya Famous Places: मेघालयात या 7 ठिकाणांना नक्की भेट द्या
- Nainital Tourist Places: नैनितालला भेट देणार असाल तर या ठिकाणी भेट द्या
- Beaches Kerala चेराई समुद्र किनारा
Maheshwar नर्मदेच्या किनारी वसलेल 'महेश्वर'
महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.
महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.
राजगादी आणि राजवाडा
नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरूनच संथ वाहत जाणार्या नर्मदेचे धीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.
महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.
महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.
राजगादी आणि राजवाडा
नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरूनच संथ वाहत जाणार्या नर्मदेचे धीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.
