1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (11:17 IST)

Maheshwar नर्मदेच्या किनारी वसलेल 'महेश्वर'

maheshwar
महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.
 
महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.
 
राजगादी आणि राजवाडा
नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरूनच संथ वाहत जाणार्‍या नर्मदेचे धीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.
 
महेश्वर हे मराठी मनांसाठी अभिमानस्पद असं गाव आहे. मध्य प्रदेशात नर्मदेच्या किनारी वसलेल्या या गावातच अहिल्याबाई होळकर यांची राजधानी होती. इथे बसूनच त्यांनी माळव्यातील मराठी दौलतीचा कारभार हाकला. पण त्याचबरोबर सम्राट कार्तवीर्य अर्जुन याची राजधानी म्हणूनही महिष्मती अर्थात महेश्वरची ओळख आहे. पहाण्यासारखं इथे बरंच काही आहे. किल्ला, मंदिरे, नर्मदेचा किनारा आणि महेश्वरी साड्या हे येथे येण्याचे आकर्षण बिंदू आहेत.
 
महेश्वरला कवेत घेऊन नर्मदा येथून जाते. या नदीवर बांधलेले घाट देखणे आहेत. पेशवा घाट, फणसे घाट, अहिल्या घाट हे प्रसिद्ध घाट आहेत. या घाटावर फारशी लगबग दिसत नाही. नदीच्या एकाच बाजूला घाट असल्याने तिथे बसून पलीकडचे ग्रामीण जीवन अतिशय छानपैकी बघता येते.
 
राजगादी आणि राजवाडा
नर्मदेच्या तीरावरच किल्ला आहे. त्यातील राजगादीवर अहिल्याबाईंची मूर्ती आहे. ही राजगादी पाहिल्यावर तो सगळा काळ जिवंत होऊन आपल्यासमोर ठाकतो. या किल्ल्यावरूनच संथ वाहत जाणार्‍या नर्मदेचे धीरगंभीर पात्र दिसते. याच किल्ल्यात महेश्वरी साड्या तयार करण्याची केंद्रे आहेत. या विणकरांना अहिल्याबाईंनी त्यावेळी सूरत वगैरे शहरातून बोलवले होते. त्यांच्या पुढच्या पिढ्याही येथे हेच काम करत आहेत. किल्ल्यातील छोट्या मंदिरातूनच येथील प्रसिद्ध दसरा उत्सवाची सुरवात केली जाते.