suvichar

पाण्याने दिवा जळतो असे रहस्यमयी माता भवानी मंदिर गाडियाघाट

शनिवार, 21 डिसेंबर 2024 (07:30 IST)
India Tourism : भारतात अनेक प्राचीन मंदिरे आहे. तसेच यामधील अनेक मंदिरे रहस्यमयी देखील आहे. जेथील रहस्य अजून देखील उघडले नाही. 
 
तसेच आज आपण अश्याच एका रहस्यमयी मंदिराबद्दल पाहणार आहोत. भारतातील मध्य प्रदेश राज्यामध्ये गाडियाघाट गावात माता भवानीचे 'एक मंदिर आहे. हे मंदिर प्राचीन असून या मंदिराची विशेषतः म्हणजे जिथे तेल किंवा तुपाच्या ऐवजी पाण्याने दिवे लावले जातात? तसेच हे मंदिर रहस्यमयी म्हणून देखील ओळखले जाते. 
 
तसेच भारतातील प्रत्येक शहरात अनेक मंदिरे आहे. काही मंदिरांचे रहस्य आणि चमत्कार जाणून भक्तांना देखील अनेकदा आश्चर्य वाटते. पण तुम्हाला माँ भवानीच्या या मंदिराबद्दल माहिती आहे का, जिथे पाण्याने दिवे लावले जातात?  
 
गाडियाघाट मंदिराचे रहस्य-
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून गाडियाघाट माता मंदिरात केवळ पाण्यानेच दिवे लावले जात आहे. यामागील गूढ अजून कोणालाही उकलता आलेले नाही. हे मंदिर मध्य प्रदेश राज्यात असून गाडियाघाट माता मंदिर शाजापूर जिल्ह्यातील नळखेडा गावापासून 15 किलोमीटर अंतरावर गाडिया गावाजवळ आहे.
 
या मंदिरात महाज्योती जळत असल्याचे मानले जाते. तसेच देवीसमोर लावलेला हा दिवा लावण्यासाठी तेल किंवा तुपाचा वापर केला जात नाही. या मंदिराचा चमत्कारिक दिवा पाण्याने जळतो. मंदिराजवळून वाहणाऱ्या कालीसिंध नदीचे पाणी या दिव्यामध्ये टाकले जाते, तेव्हा हे पाणी चिकट तेलात बदलते ज्यामुळे दिवा जळतो.
 
असे मानले जाते की एकदा देवीने या मंदिराच्या पुजाऱ्याला स्वप्नात दर्शन दिले आणि त्यांनी कालीसिंध नदीच्या पाण्याने दिवा लावण्याची आज्ञा केली. तेव्हापासून या मंदिराचा दिवा तेल किंवा तुपाच्या ऐवजी या नदीच्या पाण्याने प्रज्वलित केला जातो. जर तुम्हीही माता भवानीचे भक्त असाल तर या चमत्कारिक मंदिराला नक्कीच भेट द्या. तसेच नवरात्रीच्या दिवसात या मंदिरात भाविकांची चांगलीच गर्दी असते. 

सर्व पहा

अक्षय कुमारच्या 'वेलकम टू द जंगल'चा विनोदी ट्रेलर प्रदर्शित; चित्रपटात ३० हून अधिक मुख्य आणि सहाय्यक कलाकार

हास्य आणि गावाकडच्या वास्तवाचा अनोखा संगम असलेल्या 'ग्राम चिकित्सालय सीझन २' चा ट्रेलर प्रदर्शित झाला

आमिर खान प्रॉडक्शन्स आणि 'लगान'ला २५ वर्षे पूर्ण आमिर खान भव्य पार्टी देणार, संपूर्ण कलाकार आणि क्रू उपस्थित राहणार

2026 आणि 2027 मध्ये आपल्या पदार्पणासह बॉलिवूडमध्ये एंट्री करणार हे नवे चेहरे

श्रद्धा कपूरच्या नवीन चित्रपट 'ईथा'च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सर्व पहा

टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती गोंडस मुलीची आई झाली

आकाशाला स्पर्श करण्याच्या इच्छेपासून ते कोडिंग शिकवण्यापर्यंत, सुशांत सिंग राजपूतची ५० अपूर्ण स्वप्ने

आमिर खानने 'लगान' आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसच्या २५ वर्षांच्या वर्धापनदिनाचा सोहळा साजरा केला

हवेत लटकणारे खांब, सतत जळणारी ज्योत; भारतातील या मंदिरांची रहस्ये शास्त्रज्ञांनाही उलगडता आलेली नाही

पेड्डी' हा २०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारा नंबर १ दक्षिण चित्रपट ठरला

पुढील लेख
Show comments