शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (15:53 IST)

Valentine Day 2022: प्रेमी जोडप्याने एकदा इश्किया गजानन मंदिराला भेट द्यावी, जाणून घ्या वैशिष्टये

फोटो साभार- सोशल मीडिया 
व्हॅलेंटाईन आठवडा सुरू झाला आहे. वर्षातील सर्वात रोमँटिक आठवड्यात, जोडपे एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने सहलींची योजना आखतात. प्रेमळ जोडप्याला अशा ठिकाणी जायचे आहे जे रोमँटिक असेल आणि त्यांच्या प्रेमाचे क्षण अविस्मरणीय बनवेल. हे ठिकाण बजेट मध्ये असेल तर गोष्टच वेगळी. 
 
जोडप्यांसाठी रोमँटिक आणि कमी खर्चाच्या सहलीमध्ये राजस्थान योग्य आहे. कमी बजेट मध्ये फिरण्यासाठी इथे बरेच काही आहे.  हे ठिकाण फक्त हवामानाच्या दृष्टीने चांगले नाही. तर रसिकांसाठी इथले सर्वात चांगले ठिकाण म्हणजे इथले खास मंदिर इश्किया गजानन आहे.  हे मंदिर रसिकांसाठी खूप खास मानले जाते. या मंदिरात रसिकांच्या मनोकामना पूर्ण होतात. इथे प्रेमी जोडप्यांनी आवर्जून भेट द्यावी. चला तर मग जाणून घेऊया रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या इश्किया गजानन मंदिराबद्दल.

* कुठे आहे हे मंदिर -
जोधपूर शहराचे नाव नेहमीच जोडप्यांच्या प्रवासाच्या यादीत समाविष्ट असते. या शहराची शैली आणि सौंदर्य हे जोडप्यांमध्ये आकर्षणाचे केंद्र आहे. इश्किया गजानन मंदिर, जे रसिकांचे खास मंदिर आहे. ते जोधपूरमध्येच आहे. हे मंदिर जोधपूरच्या परकोटे येथे आहे.
 
* इश्किया गजानन मंदिराचे वैशिष्टय़
हे गणेशाचे मंदिर रसिकांसाठी महत्त्वाचे आहे. अनेक जोडपी येथे लग्नाच्या इच्छा  घेऊन येतात. प्रेमी गणेशाला प्रार्थना करतात. म्हणूनच या मंदिराला इश्किया गजानन मंदिर म्हणतात.
 
इश्किया गजानन मंदिराची आख्यायिका अशी आहे की भगवान गणेश प्रेमी जोडप्यांसाठी  कामदेवाची भूमिका बजावतात. येथे अविवाहित मुले किंवा मुली नवस मागतात, तर ते लवकरच नात्यात गुंततात. जर आपण एखाद्यावर प्रेम करत असाल आणि त्याला आपला जोडीदार बनवायचे इच्छुक असाल तर इथे नवस  केल्याने तो आपला जोडीदार होऊ शकतो.
 
इश्किया गजाननासोबतच हे मंदिर गुरु गणपती म्हणूनही ओळखले जाते. जे लोक लग्न करणार आहेत ते देखील या मंदिरात पहिल्या भेटीसाठी आणि गणपतीच्या आशीर्वादासाठी येतात.
 
इश्किया गजानन मंदिराची खास रचना 
जोधपूरमधील इश्किया गजानन मंदिराचे बांधकाम असे आहे की मंदिरासमोर उभे असलेले लोक दुरूनही सहजासहजी दिसत नाहीत. त्यामुळे येथे रसिकांची गर्दी असते. जोडप्यांना भेटण्याचे ते मुख्य ठिकाण बनले.