संबंधित माहिती
- बजेट 2021 : बजेट म्हणजे काय? अर्थसंकल्पात काय काय असतं?
- Griha Pravesh Muhurat 2021: नवीन वर्षात आपण केव्हा केव्हा गृह प्रवेश कराल, शुभ मुहूर्त जाणून घ्या
- नवा विक्रम : तिरंगा घेऊन 72 किमीचे अंतर 9 तास 23 मिनिटात पूर्ण
- Bank Holiday फेब्रुवारीमध्ये बँका केव्हा व केव्हा बंद होतील जाणून घ्या
- शेतकरी आंदोलन: अर्थसंकल्प 2021 मध्ये शेतकऱ्यांसाठी काय तरतुदी असतील?
राज्यात २,८८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात गुरुवारी २,८८९ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०,१८,४१३ झाली आहे. राज्यात गुरुवारी ४३,०४८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ५०,९४४ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५२ टक्के एवढा आहे.
राज्यात गुरुवारी ५० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. यामध्ये मुंबई ७, नाशिक ६, अहमदनगर ४, पुणे १२, पिंपरी चिंचवड मनपा ३, सातारा ३, नागपूर ४ यांचा समावेश आहे. नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी २४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३ मृत्यू पुणे ७, नाशिक ५ आणि ठाणे १ असे आहेत.
तर ३,१८१ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण १९,२३,१८७ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२८ टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,४४,३०,२२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,१८,४१३ (१३.९९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १,९७,९४१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,८०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
