संबंधित माहिती
- 'व्होकल फॉर लोकल': 1 जूनपासून निमलष्करी दलाच्या कॅन्टिनमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील
- राज्य त्यांच्या कामगारांना परत घ्यायला तयार नाही, केंद्र सरकारनं हस्तक्षेप करावा - बाळासाहेब थोरात
- 'या' जिल्ह्यांमध्ये केंद्रीय पथक दाखल होणार
- कोणतेही झोन असलं तरी हे बंदच राहील
- 'ही' पण आहेत कोरोनाची लक्षणे
केंद्राकडे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाची मागणी
राज्यात कोरोनामुळे पोलिसांवरचा ताण वाढल्याने आता त्यांच्या मदतीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाला पाचारण करण्यात येणार आहे. राज्य सरकारने केंद्राकडे तशी मागणी केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनामुळे पोलीस अहोरात्र काम करत आहेत. त्यातच रमझानही येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळायची आहे. त्यामुळे केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या म्हणजे दोन हजार जवानांना राज्यात तैनात करावे अशी मागणी केंद्राकडे केल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनाच कोरोना झाल्याचे दिसून आले आहे. आतापर्यंत आठ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्युही झाला आहे. त्यामुळे थकलेल्या पोलिसांना विश्रांतीचीही गरज आहे. म्हणूनच पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रातील निमलष्करी दलाला पाचारण करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
