Dharma Sangrah

राजसाहेब, मला माफ करा म्हणत केली आत्महत्या

सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (10:35 IST)
किनवट येथील मनसेचे शहरप्रमुख सुनील आनंदराव ईरावार यांनी स्वत:च्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी ईरावार यांनी लिहिलेल्या ‘सुसाईड नोट’ मध्ये ‘अखेरचा जय महाराष्ट्र’ करून राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझे जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका, असा उल्लेख केला आहे.
 
सुसाईड नोटमध्ये आई मला माफ कर असे लिहित नंतर संपूर्ण कुटुंबियांची माफी मागितली आहे. तसेच पत्रात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून लिहिले की, राजसाहेब, मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण आहे आणि दोन्ही माझ्याजवळ नाही, असे म्हटले आहे. 
 
सुसाईड नोटमध्ये याप्रकारे लिहिले आहे की- 
 
“अखेरचा जय महाराष्‍ट्र“
यापुढे राजकारण करण्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती कमजोर असल्यामुळे मी माझं यापुढील जीवन माझ्या मनाने संपवत आहे. तरी माझ्यामुळे कोणालाच त्रास देऊ नका.”
 
“राजसाहेब मला माफ करा. आमच्या येथे पैसा आणि जात या गोष्टीवर राजकारण केलं जातं आणि माझ्याकडे या दोन्ही नाहीत. 
जय महाराष्ट्र
जय राजसाहेब
जय मनसे
 
“ आई मला माफ कर
तुझाचं - सुनिल
 
आई-पप्पा, काका-काकू, मोठी वहिणी, छोटी वहिणी, शिवादादा, शंकरदादा, पप्पु दादा मला माहित आहे मी माफ करायच्या लायकीचा नाही, तरीपण तुम्ही मला माफ करशाल अशी अपेक्षा बाळगतो.
यावरून किनवट पोलिस ठाण्यात आकस्‍मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

तुकाराम मुंडे यांनी ठाण्यात मोठी कारवाई करत सडका माल विकणारे दुकान सील केले

मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

LIVE: मोशी दुर्घटनेत मृतांचा आकडा ७ वर, भावेश वाणी यांचा दुर्देवी मृत्यू

फडणवीस नंतर चंद्रशेखर बावनकुळे होणार राज्याचे मुख्यमंत्री संजय राऊतांचा दावा

आता फक्त २४ रुपयांमध्ये JioFinance द्वारे ITR दाखल करा आणि JioPoints चा फायदा मिळवा

पुढील लेख
Show comments