Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गणेशोत्सव : आरती म्हणजे काय? आरत्यांबद्दल या गोष्टी माहितीयेत?

Published: मंगळवार, 19 ऑगस्ट 2025 (10:55 IST)
 
बहुतेक घरांमध्ये गणपतीबरोबर देवीची, शंकराची आरतीही म्हटली जाते.
 
देवीच्या आरतीमध्य़े भक्त देवीकडे मदतीच्या अपेक्षेने पाहात असून तिला आपल्या चांगल्या वागण्याचे आश्वासनही देतात असं पत्रकार आणि कीर्तनकार ज्योत्स्ना गाडगीळ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले.
 
त्या म्हणाल्या, "कोणत्याही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग देवीकडे आहे. तिच्याकडे आम्ही व्याकुळतेने पाहात आहोत. माझ्या आसपास असलेल्या तुझ्या सर्व स्त्री अंशाचा मी आदर करेन असंही यात भक्त देवीला सांगतात.
 
शंकरदेवाच्या आरतीबद्दल गाडगीळ सांगतात, 'लवथवती विक्राळा, ब्रह्मांडी माळा, विषेकंठकाळ त्रिनेत्री माळा' अशा शब्दांमधून समर्थ रामदासांनी शंकरदेवांचं वर्णन केलं आहे. रामदासांनी सर्वच आरत्यांमधून शब्दांमध्ये प्राण फुंकलेले दिसतात. मराठी भाषेवरचं त्यांचं प्रेम या शब्दयोजनेतून दिसून येतं. सर्व आरत्यांमधील अशा प्रकारच्या वर्णनामुळे देव साक्षात डोळ्यांसमोर उभे राहातात."
 
आरत्यांचे बदलते स्वरूप
संस्कृत भाषा आणि संस्कृती याचे अभ्यासक हेमंत राजोपाध्ये यांच्याशी बीबीसी मराठीने संपर्क साधला. आरत्यांचे बदलते स्वरुप आणि त्यांचा परिणाम याबद्दल त्यांनी माहिती दिली.
 
ते म्हणाले, "अथर्ववेदात आर्रारतिक्य नावाचा एक विधी आहे. त्यात अग्नीच्या सहाय्याने देवाच्या प्रतिमेची पूजा करण्याबद्दल सांगितलं आहे. अग्नीतल्या प्रकाशाला आपल्याकडे महत्त्व आहे. तेज देणारा, वनामध्ये सोबत करणारा, असं अग्नीचं महत्त्व आहे. त्यामुळे अग्नीचं उदात्तीकरण झालं. त्याला पावक असं म्हटलं आहे. जे आपण अग्नीत भाजतो ती गोष्ट निर्जंतूक होते.
 
अग्नी हा पावक आहे आणि तो थेट देवाशी संपर्क करून देणारा आहे. त्यामुळे त्या प्रकाशात देवतेचं दर्शन होणं पवित्र मानलं गेलं आहे. या प्रकियेविषयी रा.चि.ढेरे यांनीही वर्णन केलं आहे. आधुनिक काळात पूजेचा अधिकार सर्व वर्गांना नव्हता. त्यामुळे वैदिक पूजेत सगळ्यांना सहभागी करून सामूहिक आरतीची संकल्पना समोर आली. त्याचे राजकीय परिणामही आपण पाहिलेच आहेत."
 
त्यामुळे एकूणच समूहातील सर्व लोकांचं एकत्रीकरण करण्यासाठी, सर्वांचा सहभाग नोंदवण्यासाठी सामूहिक आरतीची संकल्पना उदयाला आली.
 



Published By- Priya Dixit 
 
 

सर्व पहा

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

दिव्यांच्या अवसेच्या दिवशी कोणत्या चुका टाळाव्यात?

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

''जगातील एकमेव १२ मुखी शिवलिंग'' असलेल्या या मंदिरात पांडव आपली शस्त्रे लपवत असत

आरती गुरुवारची-निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

पुढील लेख
Show comments