नित्यांनंद यांना आश्रय देण्यास इक्वाडोरचा नकार
अपहरण प्रकरणातील आरोपी नित्यानंद यांना आश्रय देण्यास इक्वाडोर सरकारनं नकार दिला आहे. तसेच, नित्यानंद यांना इक्वाडोरमध्ये जमीन खरेदीस केली नसल्याचंही स्पष्ट इक्वाडोर सरकारनं स्पष्ट केलंय.
दुसरीकडे, भारत सरकारनंही नित्यानंद यांच्याविरोधात पावलं उचलली आहेत. परराष्ट्र मंत्रालयानं त्यांचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच परदेशातील सर्व दूतावासांना नित्यानंद यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्यात.
