Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रशियन-युक्रेन युद्धाचा थेट नाशिकवर होतोय परिणाम

Updated: गुरूवार, 24 मार्च 2022 (15:14 IST)
 
भारताने रशियाशी करार केल्यानंतर ओझर एचएएलमध्ये रशियन बनावटीच्या मिग आणि सुखोई या लढाऊ विमानांची निर्मिती करण्यात आली आहे. सुखोई 30MKI हे अलिकडेच उत्पादित केलेले विमान आहे. भारताने आता स्वदेशी बनावटीच्या लढाऊ विमानांची निर्मिती गेल्या दशकभरापासून सुरू केली आहे. मात्र, अद्यापही अनेक सुट्या भागांसाठी भारताला रशियावरच अवलंबून रहावे लागत आहे. एका अहवालात असे म्हटले आहे की, सुखोई लढाऊ विमान सुमारे दोन दशकांपूर्वी हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट करण्यात आले होते. नंतर सुखोई 30MKI ही विमानेही आली, वास्तविक ती आधीच्या जेट विमानांपेक्षा जास्त प्राणघातक होती. या सर्व लढाऊ विमानांचे सुटे भाग रशियाकडून येतात. भारताकडे काही महिन्यांचे सुटे भाग आहेत, पण मॉस्कोमधून वेळेत त्याचा पुरवठा झाला नाही तर भारतासमोर अडचण निर्माण होऊ शकते. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी रशियावर ज्या प्रकारे निर्बंध लादले आहेत, त्यामुळे रशियाकडून सुटे भाग येण्यास विलंब होणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.भारतीय लढाऊ ताफ्यांसाठी, रशियाकडून दरवर्षी सुमारे 6,000 कोटी रुपयांचे सुटे भाग खरेदी केले जातात. भारतीय हवाई दलाकडे एकूण 272 सुखोई 30 आहेत. यापैकी अनेकांना अपग्रेड करणे आवश्यक आहे. सदर अहवालात असे सूचित होते की, सुमारे एक दशकापूर्वी सुखोई भारतातच अपग्रेड करण्यासाठी अशी योजना तयार करण्यात आली होती, परंतु विविध कारणांमुळे या प्रकल्पाला आजपर्यंत मंजुरी मिळालेली नाही.
 
अनेक लढाऊ विमाने अजूनही उडण्याच्या स्थितीत नाहीत, त्यामुळे अनेकांना अपग्रेड करण्याची गरज असल्याचे अहवाल सांगतो. अनेक सुखोई विमानांना रडार, फुल-ग्लास कॉकपिट्स आणि फ्लाइट-कंट्रोल कॉम्प्युटरने अपग्रेड करणे आवश्यक आहे. तसेच तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, यावेळी भारताला दोन आघाड्यांवरील युद्धासाठी सदैव तयार ठेवायचे आहे, तेव्हा भारताची लढाऊ विमाने अद्ययावत राहणे अत्यंत आवश्यक आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

यवतमाळच्या बोरगाव धरणावर सहलीसाठी गेलेल्या कॉलेजच्या दोन विद्यार्थिनी सेल्फी काढताना बुडाल्या

LIVE: 'कॉकरोच जनता पार्टी' स्वातंत्र्यदिनी हिंगोली जिल्ह्यात शाळा सुधारण्यासाठी उपक्रम सुरू करणार

किश्तवारमध्ये मोठा अपघात, महिंद्रा स्कॉर्पिओ चिनाब नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू

हातात इंजेक्शन आणि औषधे पण डॉक्टरी पदवी नाही! मुंबईत बनावट डॉक्टरांचा पर्दाफाश

'शाळा ठीक करा' अभियान; स्वातंत्र्यदिनी हिंगोलीमध्ये सीजेपीकडून घोषणा

पुढील लेख
Show comments