Marathi Biodata Maker

मुलीच्या नावे खोटे फेसबुक अकाऊंट लुटले पाच लाखांना

मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018 (09:30 IST)

फेसबुकने जाहीर केले की जगात २० कोटी फेसबुक खाती ही खोटी आहेत. याचीच प्रचीती मुंबई येथे आली आहे. दोघातील  पार्किंगच्या वादातून एकाने मुलीच्या नावाने फेसबुक अकाऊंट तयार केले तर ज्याच्यासोबत वाद झाला त्यला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्री केली होती. मग विश्वास जिंकून त्याला त्यानंतर एका ठिकाणी बोलावून  बेदम मारहाण तर केलीच सोबत  5 लाख रुपये लुटले आहे. ही  घटना चेंबूरमध्ये घडली आहे. चेंबूरच्या गव्हाणपाडा परिसरात राहत असलेल्या हितेंद्र उर्फ बाबू ठाकूर याचा डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्याला ८ जानेवारी रोजी  अनोळख्या मुलीची फेसबुक फ्रेण्ड रिक्वेस्ट आली होती. मुलगी मग नाही कोण म्हणतय मग काय त्याने  स्वीकारली . मग  दोघांचेही फेसबुक मेसेंजरवर बोलणे सुरू झाले. त्यात त्या मुलीने त्याला  गोवंडी येथे भेटण्यासाठी बोलावले होते. मुलगी बोलावतेय हे पाहून  ठाकूरही तेथे वेळेत हजर झाला. त्याला इथे एक लांबून मुलीने हात दाखवून त्याला जवळ बोलावल होते . त्याला वाटले की  तीच मुलगी आहे,  तो जवळ गेला. तेव्हा पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्याला लोखंडी रॉड आणि स्टंपने चोप त्याला चांगलाच दिला आहे. तर त्याच्याकडील ५ लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज लुटला आहे.  घटनेची माहिती मिळताच च देवनार पोलिसांनी ठाकूरच्या तक्रारीवरून दरोड्याचा गुन्हा दाखल केला. यावरून पोलिसानी 3 जणांना अटक केली. इतर आरोपी फरार आहे. अतर्गत वादातून हे प्रकरण घडले होते. तेव्हा कोणी फेसबुकवर अनोळखी असेल तर दोनदा विचार करा.

 

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

सरकारने ३६,००० कोटी रुपयांचे कर्ज माफ करून आपले वचन पूर्ण केले- चंद्रशेखर बावनकुळे

LIVE: महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल

18,000 कोटी रुपयांचा बदलापूर मेट्रो-14 प्रकल्प आता दोन टप्प्यांत पूर्ण होणार

ऑनलाइन कोर्स घेताना 90% विद्यार्थी करतात ही चूक; तुम्ही करणे टाळा

महाराष्ट्र देशातील पहिले रेल्वे गेट-मुक्त राज्य बनेल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ६५ प्रकल्पांना मंजुरी दिली

पुढील लेख
Show comments