गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By
Last Modified: शनिवार, 4 मे 2019 (15:09 IST)

ठाणे लोकसभा निवडणूक 2019

Thane lok sabha election result 2019
मुख्य लढत : राजन विचारे (शिवसेना) विरुद्ध आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वर्षानुवर्षे ठाण्यात शिवसेनेच्या उमेदवाराला लोकांनी निवडून दिलंय. २० वर्षे शिवसेनेचे प्रकाश परांजपे खासदार होते. त्यांच्या निधनानंतर पोटनिवडणूकीत आनंद परांजपे हे निवडून आले. २००९ साली शिवसेनेला धक्का देत राष्ट्रवादीचे संजीव नाईक या मतदारसंघातून निवडून आले. अनेक वर्षांनंतर २००९ ला शिवसेनेव्यतिरिक्त दुसरा उमेदवार निवडून आला. त्यानंतर २०१४ ला शिवसेनेने राजन विचारेंना उमेदवारी दिली.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.