suvichar

शरद पवार यांचे नातू पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात आजोबांनी केला प्रचाराला सुरुवात

सोमवार, 18 मार्च 2019 (08:35 IST)
पिंपरी-चिंचवड येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे #मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचाराचा नारळ  सभेत फोडण्यात आला.
 
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार उपस्थित होते. या सभेच्या दरम्यानच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाची दुःखद बातमी समजली. पवारसाहेबांनी प्रथम पर्रिकरांना श्रद्धांजली वाहिली व मग त्यानंतर त्यांनी सभेला संबोधित केले.
 
या सभेला संबोधित करताना विधिमंडळ नेते आ. अजित पवार म्हणाले, "लोकसभेत चांगल्या पद्धतीने प्रश्न सोडवले गेले पाहिजे. शिरूरमधून लोकसभेत कोल्हेना पाठवायचं आणि मावळ मधून पार्थला. विनाअट शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला आहे. जास्तीत जास्त उमेदवार निवडून जावे यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रयत्न करायचे आहेत. भाजपा काळात महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या झाल्या. शास्ती कर आणि अनधिकृत बांधकाम अधिकृत करण्याबाबत सांगितलं जात आणि निवडणूक झाल्या की भाजपाचे सगळे लोक हे विसरतात.राफेल विमानाबाबत उत्तर देत नाहीत. राफेलची कागदपत्रे चोरीला जातात. धनगर आरक्षणाची कागदपत्रे गहाळ झाली. त्याबाबत उत्तरही देत नाहीत. पळवाटा काढतात.नेता शरद पवार यांच्यासारखा असावा लागतो. फोर्ड मोटर्स मधील कामगारांना 14 वर्षा नंतर कामावर घेण्यात आले. शरद पवार यांच्या मध्यस्तीने हे काम झालं.निवडणूक आली की प्रभू रामचंद्रांचं नाव घ्यायचं. मंदिर बांधायचं मधेच काढतात. साडेचार वर्ष काय झोपा काढल्या काय? जो माणूस वडिलांचं स्मारक बंधू शकत नाही. तो काय मंदिर बांधणार? नितिन गडकरी स्वतः म्हणतात या सरकारमध्ये मला काम करू देत नाहीत. संविधान बदलण्याची भाषा हे सरकार करतंय. जगात आपलं संविधान सर्वात श्रेष्ठ आहे. असं असताना ते बदलण्याची भाषा करत आहेत. येणारी निवडणूक फार महत्वाची आहे. राष्ट्रवादी आणि सगळे मित्रपक्ष यांना निवडून देण्याचं काम जनतेने करायचं आहे."राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील या सभेला संबोधित करताना म्हणाले, "मावळला सर्वांच्या मनातला खासदार मिळाला आहे. मावळ लोकसभेतल्या सर्व घराघरात लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून पार्थ यांना उमेदवारी दिली. अनेक उमेदवार चांगले होते. परंतु सर्वांचा दुजोरा पार्थ पवार यांना होता. म्हणून त्यांना उमेदवारी दिली.भाजपा अपप्रचार करण्याचा प्रयत्न करणार आहे. जातीयवाद पेटवण्याची काम करणार. सावधानतेने ही निवडणूक लढवली पाहिजे. भाजपाने देशावर 51 लाख कोटी रुपयांचं कर्ज आता 82 लाख कोटी इतकं वाढवलं. चौकीदार महाशय म्हणतात की न खाउंगा न खाने दूंगा. पण रिझर्व्ह बँकेचं वाटोळं करण्याचं काम यांनी केलं."

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

वांग्याला वर्षभर बाजारात मागणी असते; यशस्वी आणि भरघोस लागवड करण्यासाठी माहिती

LIVE: प्रशासनाने आषाढी वारी २०२६ च्या तयारीला वेग दिला

आषाढी वारी २०२६: वारकऱ्यांच्या सुरक्षेला आणि सुविधांना सर्वोच्च प्राधान्य, पालकमंत्री विखे पाटील यांचे निर्देश

Father's Day 2026 Wishes in Marathi फादर्स डे शुभेच्छा मराठीत

१८२ देशांमध्ये शांततेचा संदेश दिल्याबद्दल गुरुदेव श्री श्री रविशंकर यांना लक्ज़मबर्ग शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला

पुढील लेख
Show comments