suvichar

डिजिटल डिव्हाइसच्या वापराने नात्यातील प्रेम वाढतं की कटुता?

गुरूवार, 28 जून 2018 (16:55 IST)
तसे तर दोन प्रेम करणार्‍या व्यक्तींना जवळ आणण्यासाठी डिजिटल डिव्हाइस महत्त्वाची भूमिका   बजावतात. पण अनेकदा मोबाइलच्या आणि इंटरनेटच्या अधिक वापराने नात्यात प्रेमाऐवजी कटुता अधिक वाढते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका शोधातून हा खुलासा झाला आहे. 
 
'Kaspersky Lab' यांच्याकडून करण्यात आलेल्या एका सर्व्हे रिपोर्टनुसार, 50 टक्क्यांपेक्षा अधिक कपलमध्ये भांडण होण्याचं मुख्य कारण पार्टनरचा जेवताना किंवा बोलताना मोबाइलचा वापर हे आहे. त्यासोबतच लिव्ह-इनमध्ये राहणार्‍या 60 टक्के लोकांच्या भांडणाचंही हेच कारण आहे. तर जे कपल वेगळे राहतात त्यातील केवळ 49 टक्के लोकांमधील नात्यात कटुता आढळली आहे. 
 
ds by ZINC 
या सर्व्हेमध्ये जगभरातील 18 देशांच्या जवळपास 1800 लोकांना सहभागी करण्यात आले होते. हे सगळे लोक 6 महिन्यांपेक्षा जास्त काळापासून नात्यात आहेत अशांचा यात समावेश करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, आपल्या पार्टनरने त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं लोकांना अजिबात आवडत नाही. सर्वांनाच हे वाटतं की पार्टनरचं लक्ष त्यांच्याकडे असावं.
 
Kaspersky Lab  चे व्हाईस प्रेसिडेन्ट ऊाळींीू श्रशीहळप म्हणाले की, जेव्हा दोन लोक एकमेकांपासून वेगळे राहतात, तेव्हा डिजिटल डिव्हाइस त्यांना जवळ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. पण त्याच्या प्रमाणापेक्षा जास्त वापराने नात्यात कटुता येण्यासारख्या आणखीही काही गंभीर समस्या होऊ शकतात.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

LIVE: हवामान विभागाने आज मुंबईसह या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला

BSNL चे सहकार्य, मच्छिमारांसाठी समुद्रात संपर्क आणि सॅटेलाइट फोन योजनेसाठी महाराष्ट्र सरकारचा पुढाकार

World Youth Skills Day 2026 : जागतिक युवा कौशल्य दिन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कर्जमाफी योजनेत सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला

पुढील लेख
Show comments