suvichar

किल्ले चौल्हेर

Updated: शुक्रवार, 6 जुलै 2018 (17:02 IST)
 
सूर्यास्त झाल्यानंतर चांदणं असलं म्हणजे पायाखालची वाट स्पष्ट दिसते. गडकोटांचं रात्रीचं विश्व काही वेगळंच असतं. तासाभराची खडी चढाई झाल्यानंतर कातळकोरीव पार लागतात. या पायर्‍या चढून गेल्यानंतर गडकिल्ल्यावरची शोभा पाहून मन प्रसन्न होते. एका मागोमाग सलग तीन दरवाजे दृष्टीला पडतात.
 
प्रत्येक किल्ला त्याचं वेगळं रूप आपल्यासमोर मांडत असतो. कधी इतिहासातून, कधी भूगोलातून तर कधी स्थापत्यातून त्याचं रूप दिसतं. या स्थापत्यातून सारे पदर असतात. पाण्याची टाकी, तटबंदी, बुरूज, गुहा, पार आणि चौल्हेरची दरवाजांची रांग हे तीन दरवाजे म्हणजे चौल्हेरच्या गडसफरीच.
 
हे दरवाजे पार केले की डाव्या बाजूला छोटी माची लागते आणि उजव्या बाजूला बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे. या दरम्यान पायर्‍या आणि पाण्याची टाकी दिसते. हे सारे पार केल्यावर बालेकिल्ल्याच्या माथ्यावर पोहोचता येते. चांदणे असल्यामुळे वाट स्पष्ट दिसते. गडमाथा फिरण्यास अर्धा तास पुरतो. गडावर चौरंगनाथ आणि हनुानाच्या मूर्ती आहेत.
तिळवाचा किल्ला अथवा चौरगड किंवा चौल्हेरचा किल्ला अशा विविध नावांनी हा किल्ला ओळखला जातो. हा किल्ला अपवादानंच पाहिला जातो. बर्‍यापैकी चढाई असणारा हा गिरीदुर्ग इतिहासात एवढा ज्ञात नसला तरी त्यावरील उत्कृष्ट स्थापतने म्हणजे प्रवेशद्वारांची ओळख लाभलेले हे दुर्गरत्न सरोवरच भटक्यांच्या यादीत नसणं हे खेदजनक म्हणावं लागेल.
 
नाशिकमध्ये येऊन गडदुर्ग पाहणार्‍या पर्यटकांची संख्या काही कमी नाही. ही भटकंती ठरावीक दुर्गांसाठीच न करता चौल्हेरचा किल्ला पर्यटकांनी अवश्य पाहावा. या गडाचं देखणेपण पर्यटकांची वाट सफल आणि सुफल करेल यात शंका नाही.
 
म. अ. खाडिलकर 

सर्व पहा

'नयी नवेली'चा धमाकेदार टीझर प्रदर्शित, यामी गौतमचा आतापर्यंतचा सर्वात अनोखा अवतार समोर आला

'हनुमान अंश' चित्रपटादरम्यान थिएटरमधील सीट क्रमांक ९ रिकामा का ठेवला जात आहे? यामागील रहस्य जाणून घ्या

'हनुमान अंश २' मध्ये विराट आणि अनुष्का दिसणार? नीम करोली बाबांवर आधारित चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल मोठा संकेत

सूर्यास्तानंतर जंगलात प्रवेशास बंदी! ४०० वर्षे जुन्या 'वन देवी' मंदिराच्या दंतकथेवर आधारित तमन्ना भाटियाचे 'व्वाण' चित्रपट?

'दृश्यम द कन्क्लुजन'चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित, जयदीप अहलावत अजय देवगणच्या विरुद्ध भूमिकेत

सर्व पहा

सलमान खानचा अंगरक्षक शेराचा मुलगा अबीर सिंग 'टार्झन'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार

'रामायण'मधील पहिले गाणे 'जय जय राम' प्रदर्शित, साई पल्लवी-रणबीर कपूरच्या 'सिया राम' लूकने प्रेक्षकांची मने जिंकली

'हनुमान अंश'नंतर विशाल चतुर्वेदीने 'राम बोला' या नवीन चित्रपटाची घोषणा केली

गणेश चतुर्थीला इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी दरवर्षीप्रमाणे आपल्या घरी केले बाप्पाचे स्वागत

रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटातील पहिले गाणे 'जय जय राम' गणेश चतुर्थीला प्रदर्शित

पुढील लेख
Show comments