Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

यश एका दिवसात नाही

Updated: बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (11:46 IST)
आजकाल प्रत्येकाला त्वरित यश मिळवायचं असतं. तरुण पिढी नोकरी करायला लागून एक वर्ष पूर्ण होत नाहीत तोवरच ते प्रमोशनची मागणी आणि अपेक्षा करायला लागतात. अशाच प्रकारे विार्थी परीक्षेच्या आधी केवळ दोन महिन्यांपासून अभ्यासाची पुस्तकं वाचायला लागतात आणि परीक्षेच्या निकालात त्यांना चांगले गुण अपेक्षित असतात. आपल्याही मनात तसं येत नसेल तर ते वास्तवात शक्य होणार नाही, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याला पुढचं मार्गक्रमण करायचं असेल तर कोणतीही कामं न करता हळूहळू कार्यरत व्हायला हवं. एकाच दिवसात यश कधीही मिळत नाही. एखादं मोठं घर बनवण्यासाठी लहान आकाराच्या असंख्य विटांचा वापर करावा लागतो.त्यामध्ये यशाचा महाल तयार करायचा असेल तर त्यासाठी कष्ट तर घ्यावेच लागतील.
 
आज आपण यशस्वी व्यक्तीकडे पाहून त्याच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याआधी त्या व्यक्तीची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला हवी. त्यानेही छोट्या छोट्या गोष्टींना सुरुवात करुन आज तो यशोशिखरावर पोहोचलेला असतो. एखादी व्यक्ती आपल्याला त्वरित यशस्वी बनवण्याचं किंवा आपली प्रगती त्वरित होईल अशी आश्वासनं देत असेल तर ती व्यक्ती आपल्यासाठी खोटारडेपणा करुन तुम्हाला धोका देण्याचा प्रयत्न करत आहे, हे लक्षात घ्या. आपण यश मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करायला लागता त्यावेळी नंतर हे परिश्रमच यशाचा पाया ठरतात. मेहनत केल्याशिवाय यशाची पायाभरणी होत नाही आणि आपण आपलं उद्दिष्ट साध्य करु शकत नाही. एखादी टेकडी त्या जागेवरुन दूर करायची असेल तर तिच्या पायापासून सुरुवात करायला हवी. त्यामध्ये सुरुवातीला येणार्या अडचणी आपण दूर करु शकाल तर एक मोठं स्वप्न साकार होण्यास वेळ लागणार नाही. ते करण्यासाठी आपल्यामनाला सातत्याने प्रोत्साहन देत राहिलं पाहिजे.
 
असं करताना हे तू करु शकणार नाहीस असं कोणी म्हणत असेल तर घाबरुन जायचं कारण नाही तर आपण आत्मविश्वासानेकाम करत राहिलं पाहिजे. आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने रोज एक पाऊल उचललं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन काम पूर्ण करण्याच्या दिशेने आपण प्रयत्न करता त्यावेळी आपण उत्साहित राहतो. काम करण्याची प्रेरणा वाढते. पुढे जाण्याचा उत्साह कायम असेल तर आपल्याला मिळणारा विजय निश्चित ठरतो.
सतीश जाधव

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments