Dharma Sangrah

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा,आजपासून सुरुवात

शनिवार, 15 सप्टेंबर 2018 (09:46 IST)
सहा देशांचा सहभाग असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा प्रारंभ शनिवार अर्थात आजपासून बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली आहे. गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.
 
दुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. 
 
सामन्याची वेळ : सायं. ५ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

IND vs AFG : भारताने कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला

निवड समितीने जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्यासाठी एक विशेष योजना आखली

Women's T20 World Cup 2026: महिला भारतीय संघ पाकिस्तानपूर्वी या दोन संघांचा सामना करणार

Team India Squad: इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी संघ जाहीर, श्रेयस अय्यर कर्णधार; तिलक वर्मा उपकर्णधारपदी

संघाबाहेर असलेला श्रेयस अय्यरची भारताचा टी२० कर्णधारपदी निवड

पुढील लेख
Show comments