आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऋषभ पंत दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर संघात परतला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर केला आहे. शुभमन गिलला कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. दीर्घकाळ अनुपस्थितीनंतर पंत भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करत आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता.
निवडकर्त्यांनी अनुभवी आणि तरुण प्रतिभेचा समतोल असलेला एक मजबूत संघ निवडला आहे. यशस्वी जयस्वाल, साई सुदर्शन आणि देवदत्त पडिकल सारखे तरुण खेळाडू संघात समाविष्ट करण्यात आले आहे, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज जलदगती गोलंदाजीचे नेतृत्व करतील.
बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दुखापतीमुळे वेस्ट इंडिज मालिकेतून बाहेर पडलेला यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत संघात परतला आहे. पंतला संघाचा उपकर्णधारही म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. दोन सामन्यांची कसोटी मालिका १४ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
Edited By- Dhanashri Naik