suvichar

अंडर-19 विश्वचषक, भारताची अंतिम फेरीत धडक

मंगळवार, 30 जानेवारी 2018 (11:17 IST)

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत  भारताने  धडक मारली आहे.  पृथ्वी शॉनच्या भारतीय संघानं पाकिस्तानचा २०३ धावांनी धुव्वा उडवून दिला. आता  अंतिम सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात भारतानं पाकिस्तानला विजयासाठी २७३ धावांचं आव्हान दिलं आहे. त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अवघ्या ६९ धावांत आटोपला.

भारताकडून ईशान पोरेलनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. त्याआधी, या विश्वचषकात सातत्यानं फलंदाजी करणारा शुभमन गिल भारतीय डावाचा पुन्हा हिरो ठरला. त्यानं या सामन्यात नाबाद शतक झळकावून भारताला ५० षटकांत नऊ बाद २७२ धावांची मजल मारुन दिली. गिलनं ९४ चेंडूंत सात चौकारांसह नाबाद १०२ धावांची खेळी उभारली.

या सामन्यात पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरानं ८९ धावांची सलामी देऊन भारतीय डावाचा भक्कम पाया रचला होता. शॉनं ४१, तर कालरानं ४७ धावांची खेळी केली. हार्विक देसाई वीस धावांवर बाद झाला.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

बलात्कार प्रकरणात दिल्ली कॅपिटल्सचा क्रिकेटपटू अभिषेक पोरेलच्या अटकेचे आदेश

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

दिल्ली कॅपिटल्सचा आशुतोष शर्मा एकदिवसीय चषक स्पर्धेत हॅम्पशायर संघाकडून खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना

लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत इतिहास रचला

रोहित आणि कोहली यांनी लॉर्ड्सवर इतिहास रचला, ४०० सामने खेळणारी पहिली भारतीय जोडी ठरली

पुढील लेख
Show comments