suvichar

अकाली मृत्यू केवळ चर्चा नव्हे तर बोधाचा विषय

Updated: सोमवार, 26 फेब्रुवारी 2018 (18:03 IST)
 
श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर जेवढेही कारणं मांडण्यात येत आहे... त्यातून आम्ही ती नशेत होती किंवा ती तरुण दिसण्यासाठी शस्त्रक्रिया करवत होती ज्याच्या विपरित परिणाम दिसून आला... वगैरे वगैरे.. आणि त्यावर आमचे ज्ञान... हे करणे तर अगदी चुकीचे आहे हे देण्याऐवजी... हा विचार करावा की तिला याचे परिणाम आपल्या सगळ्यापेक्षा कितीतरी स्पष्ट माहीत होते तरी तिच्यासाठी हीच प्राथमिकता असावी. यावरून आपली प्राथमिकता काय हे पण ठरवावे. पुरुषांसाठी सौंदर्य महत्त्वाचे म्हणून आपल्या जीवावर बेतले तरी कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स वापरून, पोटाला शिक्षा करून सुंदर दिसण्याची स्पर्धा ही आपली प्राथमिकता आहे का? किंवा लाइफस्टाइल म्हणून एकीकडे तासंतास जिममध्ये घालवणे आणि नंतर नशा करणे ही आपली गरज आहे का? हे प्रत्येकाने आपआपले ठरवावे.
 
खरं तर यापेक्षा महत्त्वाचे हे आहे की आपल्या कोणत्या गोष्टीने समाधान होतोय. जरा एखाद्या सुंदर आणि जिरो फिगर दिसून समाधान वाटत असेल आणि त्यासाठी जी किंमत मोजावी लागत आहे ती कितपत योग्य आहे यावर विचार केलाच पाहिजे. तरी ही आपली इच्छा सगळ्या नकारात्मक पक्षांवर भारी वाटत असल्यास प्रत्येक व्यक्ती आपले निर्णय घेण्यासाठी मोकळा असतो. ताणमुक्त जीवन यशस्वी जीवनाची मूलभूत पायरी असावी आणि समाधान हे यश. आपल्या कामामुळे आपल्या मनाला समाधान मिळतंय का? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि ते काम अगदी काहीही असून शकतं .. कोणत्याही क्षेत्रातील असू शकतं कारण यश मिळवण्यासाठी केवळ स्त्रीत्वाचा वापर करणे अगदी गरजेचं असतं असे नाही. आपल्या कौशल्य आणि गुणांमुळेही पुढे वाढता येतं. असं नसतं तर आजपर्यंत नाम कमावणार्‍या कित्येक स्त्रियांच्या सौंदर्यांकडे कधीच कोणाचे लक्ष गेले नाही कारण त्यांचा आत्मविश्वास त्याच्या चेहर्‍यावरील सौंदर्य म्हणून दिसून आले.
 
अर्थातच समाधानी जीवन हे कितीतरी महत्त्वाचे आहे हे समाधान प्रत्येकाने आपआपल्या परीने शोधायला हवे आणि त्यासाठी योग्य दिशेकडे वळावे. त्यासाठी जीवावर बेतून वरील सौंदर्याची गरज कधीच भासत नाही. केवळ आपला उद्देश्य स्पष्ट असावा आणि विश्वास कोणत्याही किमतीवर ढासळू द्यायचे नाही याची मानसिक तयारी.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

LIVE: पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई: चर्चगेट-विरार रेल्वेमार्गालगतची बेकायदेशीर अतिक्रमणे हटवण्याची मोहीम

अत्यंत फायदेशीर व्यवसाय "लसूण लागवड Garlic Farming"

मी हक्कांविषयी बोलण्यासाठी गेलो होतो; पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर शरद पवारांनी दिल्ली दौऱ्याचे कारण स्पष्ट केले

सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे मुंबईत पूरस्थिती; ४८ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी

एसी, रेफ्रिजरेटर, की सीलिंग फॅन; वर्षभरात कोणते घरगुती उपकरण सर्वाधिक वीज वापरते?

पुढील लेख
Show comments