Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'माझी मीच फेव्हरेट'

Updated: शुक्रवार, 10 जून 2022 (16:59 IST)
 
एक वेळ अशी देखील येते की हसत-खेळत खांद्यावर टाकलेल्या जवाबदारीचे ओझे उचलत असताना आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण घालवलेल्या आणि प्रेमाच्या माणसांचा सन्मान देखील डोळ्यादेखील वाहून जाताना मुकाट्याने पाहावं लागतो आणि एकदा काय सन्मान हरवला तर आत्मविश्वासही सोबत निघून जातो...कितीतरी महिला स्वत:ची खरंच काही लायकीच नाही असा विचार करत प्रयत्न सोडतात आणि समर्पण करतात...
 
अशात जर काही ठाम मनाचे आत्मविश्वासी स्वत:वर प्रेम करु लागतात तर समाजाला हे देखील बघवतं नाही कारण हल्ली लोक असे झाले आहेत की... जर कुणी रडत असेल तर रडू द्या... आपल्याला काय? मात्र कुणी हसत असेल... तर आनंदी होण्याचं नेमकं कारण आहे तरी काय..?
 
या कल्पनेतून बाहेर पडली परिस्थिती ती स्वत:वर प्रेम करण्याची अर्थात स्वतःशी लग्न करण्याची ... ज्यात नवराच नवरी आणि नवरीच नवरा.... तस तरं गेल्या काही वर्षांत प्रेम किंवा विवाह हा दोन भिन्न लिंगांमधील विषय राहिलेला नाही.... अशी अनेक लग्ने पाहण्यात येते ज्यात दोन मुलांची लग्ने तर दोन मुलींची लग्न थाटामाटात झाली... पर सोलोगॅमी विवाहात तर जोडीदाराची गरजच नाही...
 
गुजरातच्या वडोदरा येथील क्षमा बिंदूने सोलोगॅमी विवाह करुन नव्या वादाला जन्म दिला असला तरी... याची सुरुवात 90 च्या दशकात झाली आहे. लिंडा बेकर नावाच्या महिलेने 1993 मध्ये स्वतःशी लग्न केले... लिंडा बेकरच्या लग्नाला प्रथम स्व-विवाहाचा दर्जा मिळाला.. सुमारे 75 लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित होते.... 1993 नंतर असे अनेक प्रसंग आले आहेत जेव्हा लोकांनी असे विवाह केले आहेत...
 
आता सेल्फ मॅरेज असेल तर सेल्फ डिव्होर्स ही संकल्पनाही येणार हे नक्की. जिथे लग्न आहे तिथे घटस्फोटाचीही शक्यता असते. ब्राझिलियन मॉडेल ख्रिस गॅलेराने स्वतःला घटस्फोट दिला होता. कारण 90 दिवसांनंतर ती प्रेमात पडली होती... शेवटी काय प्रेमात पडणे...
 
मुली स्वत:च्या प्रेमात पडत आहेत कारण त्यांना मोकळा श्वास घेयचा आहे... वर्षानुवर्षे चालत आलेल्या समजुतींना चिकटून न राहता पुढे जायचे आहे... स्वावलंबी, यशस्वी असल्यामुळे कोणत्याही बंधनात अडकू राहयचं नाहीये.. स्वत:च्या आयुष्याचे निर्णय स्वत: घेयचे आहेत... जोडीदाराच्या अपेक्षा, कर्त्वय यात अडकायचं नाहीये...
 
मग प्रश्न हा देखील आहे की विवाहाची गरजचं काय? तर सोलोगॅमीसारख्या गोष्टी त्यांच्यासाठी समाजाच्या त्या प्रश्नाचं उत्तर देखील ठरु शकतं की लग्न कधी करणार? लग्न झाल्यावर पाळणा कधी हलणार... अशात एसेक्सुअल लोक देखील सोलोगॅमीला अधिक प्राधान्य देऊ शकतात... ज्याने स्व:विवाह केल्यावर अशा नजरांना उत्तर मिळतं... त्याहून महत्त्वाचं म्हणजे स्वत:च्या मनाला आवडत म्हणून नटून-थटून सोहळा पार पाडायचा... स्वत:च कौतुक करुन घ्यायचं... आणि शेवटी काय संसार थाटायचं मनात आली तरी पर्याय नेहमीच खुले असणारच...
 
क्वीन चित्रपटामधील हनिमूनला एकटीच परदेशी जाणारी कंगना राणौत असो किंवा हल्लीच्या वेबसीरीज असो... मनावर नक्कीच प्रभाव टाकतात... परंतु हे विषय सहजासहजी आले नसावे... यांची पार्श्वभूमी कुठतरी तर तयार झाली असावी... कारण प्रत्येक कथेमागे अनेक न ऐकलेल्या कहाण्या दडलेल्या असतात...
 
समाजासाठी मुलींचे हे पाऊल नक्कीच धोक्याची घंटा आहे कारण हा ट्रेंड वाढला तर वधू शोधण्यासाठी मुलांना धडपड करावी लागू शकते... गुजरातमधील नवविवाहित तरुणी अक्षदा देसाई यांचे म्हणणे आहे की हा निर्णय चुकीचा म्हणता येणार नाही मात्र प्रपंच मांडण्याची गरज देखील नाही. अशाने एकट्याने पुढे प्रगतीच्या मार्गावर जात असलेल्या मुलींना अडथळे येऊ शकता.. कदाचित त्यांचे पालक सचेत होऊन मुलींना वेळ न देता त्यांना लवकरात लवकर लग्नाच्या बेडीत बांधू शकतात.
 
तर कित्येक वर्षांपासून आपला संसार थाटाने सुरु असलेल्या महाराष्ट्राच्या शिल्पा कर्पे म्हणतात की घर-संसार आणि कुटुंब म्हटलं की जवाबदार्‍या, संघर्ष हे तर येणारच.. पण शेवटी यालाच तर आयुष्य जगणं म्हणतात... तडजोड करावी लागली तरी जेव्हा आपलं कुटुंब फुलताना दिसतं तेव्हा त्या आनंदाच्या क्षणाचे वर्णन आपण शब्दात करूच शकत नाही...
 
पण आता गरज आहे समाजाने देखील जरा विचार करण्याची... आईच्या पोटात असल्यापासून सुरु झालेला मुलीचा संघर्ष अखेर श्वासापर्यंत सुरुच राहतो...तिला स्वातंत्र्य देण्याची मागणी करण्याचा तर प्रश्‍नच चुकीचा ठरेल कारण तिच्यावर अधिकार गाजवण्याचा हक्क तुम्हाला दिला तरी कोणी? फक्त तिला जगू त्या.... उडू द्या... वाहू द्या... तर सृष्टी आपोआप बहरेल...
About Author
रूपाली बर्वे
मीडिया क्षेत्रातील २२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या रूपाली बर्वे या एक अष्टपैलू पत्रकार आणि संपादक आहेत. मागील २० वर्षांपासून त्या 'वेबदुनिया' पोर्टलशी जोडलेल्या असून सध्या 'असिस्टंट एडिटर' म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी फील्ड रिपोर्टिंग, कंटेंट रायटिंग, डेस्क एडिटिंग आणि डिजिटल मीडिया अशा विविध स्तरांवर काम केले असून, प्रसिद्ध व्यक्तींच्या मुलाखती.... Read More

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मुलाला वाचवण्याचा प्रयत्नात आई-वडील खवल्या पहाडावरून पडले; भीषण दुर्घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू

LIVE: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघातात आई वडील मुलाचा मृत्यू

महाराष्ट्रात मोकळ्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी, उल्लंघन केल्यास १० लाख रुपयांचा दंड; तुकाराम मुंडे यांचे आदेश

महाराष्ट्राच्या पशुधनाला राष्ट्रीय मान्यता मिळाली, पंकजा मुंडे यांनी पशुपालकांसाठी अभिमानाची बाब म्हटले

मुंबई : सोसायट्यांमध्ये बकऱ्यांचा बळी दिला जाणार नाही! तर रस्त्यावरील भटक्या प्राण्यांना खाद्य देण्यासही मनाई

पुढील लेख
Show comments