Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Health Day : कोरोना संकट काळात जाणून घ्या या दिवसाचा इतिहास

Updated: मंगळवार, 6 एप्रिल 2021 (10:53 IST)
 
जागतिक आरोग्य दिन कधी सुरू झाला?
1950 साली World Health Day ची सुरुवात जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO द्वारा करण्यात आली होती. या दिवशी WHO चा स्थापना दिन असतो, ज्यांच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. डब्ल्यूएचओ संयुक्त राष्ट्र संघाचा एक भाग आहे. जगातील आरोग्याच्या समस्येवर देखरेख ठेवणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे WHO चे मुख्य कार्य आहे.
 
​WHO कधी सुरू झाले?
7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना झाली. तेव्हा WHO सोबत 61 देश जुळलेले होते. याची पहिली बैठक 24 जुलै 1948 रोजी झाली होती. याचं मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा शहरात आहे. 1950 साली World Helath Day साजरा करण्याची सुरुवात झाली.
 
​जागतिक आरोग्य दिनाचे उद्दीष्ट काय आहे?
1950 पासून हा दिन साजरा करण्यामागील उद्दीष्ट जागतिक स्तरावर आरोग्यविषयक समस्यांवर चर्चा करणे आहे. केवळ चर्चा नव्हे तर आरोग्य सेवा आणि आरोग्याशी संबंधित अफवा किंवा गैरसमज देखील दूर करणे देखील आहे. WHO विविध देशांमधील सरकारांना आरोग्य धोरणे तयार आणि अंमलात आणण्यासाठी प्रेरित करतं.
 
​WHO चे उत्तम कार्य
आपल्या स्थापना काळापासून आतापर्यंत WHO ने स्मॉल पॉक्स सारखे आजार नष्ट केले आहे. भारत सरकारने देखील पोलिओसारख्या मोठ्या आजारावर विजय मिळविला आहे. या व्यतिरिक्त TB, HIV, AIDS आणि Ebola यासारखे जीवघेणे रोग रोखण्यासाठी जोरदार प्रयत्नही केले जात आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूचे उच्चाटन करण्यासाठी अनेक देश डब्ल्यूएचओ बरोबर काम करत आहेत.
 
WHO चं उद्देश
WHO चं उद्देश लोकांना त्यांच्या आरोग्याप्रती जागरूक करणे आहे. या ‍दिनानिमित्त आपण प्रण केला पाहिजे की आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्याल. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला, उपचार, निरोगी जीवनशैली, योग्य ज्ञान प्राप्ती, आणि जागरुक राहणे हे सर्व महत्त्वाचे आहे.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

९ ऑगस्ट रोजी मुंबईत जंबो ब्लॉक, अनेक लोकल ट्रेन्स रद्द

LIVE: मुंबईत मेट्रो स्कूल उडवून देण्याची महापौरांना धमकी

मुंबईत मेट्रो स्कूल उडवून देण्याची महापौरांना धमकी, पोलिसांकडून सायबर तपास सुरू

मुंबई उच्च न्यायालयाकडून रमेश म्हात्रे यांचा जामीन मंजूर, राज्य सोडण्याचे आदेश दिले

महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, क्रिप्टो मालमत्तेचा एमपीआयडी कायद्यात समावेश

पुढील लेख
Show comments