Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

World Human Rights Day 2025 जागतिक मानवी हक्क दिन

Updated: बुधवार, 10 डिसेंबर 2025 (09:55 IST)
उद्देश
या घोषणेमध्ये वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येक व्यक्तीला जन्मसिद्ध असलेले हक्क आणि स्वातंत्र्य नमूद केले आहे. यात जगण्याचा अधिकार, स्वातंत्र्याचा अधिकार, समानता आणि सन्मानाचा अधिकार यांचा समावेश होतो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जगभरातील नागरिकांना त्यांच्या मानवी हक्कांबद्दल जागृत करणे आणि त्या हक्कांचे महत्त्व समजावून सांगणे आहे. तसेच सर्व लोकांना सन्मान, स्वातंत्र्य आणि न्याय मिळावा यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. तसेच भारताच्या संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्कांची हमी दिलेली आहे.

इतिहास आणि महत्त्व
१९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेने १० डिसेंबर १९४८ रोजी जागतिक मानवी हक्कांची जाहीरनामा (Universal Declaration of Human Rights - UDHR) स्वीकारला. हाच जाहीरनामा मानवी हक्कांचा पहिला आंतरराष्ट्रीय दस्तऐवज आहे, ज्यात ३० कलमांमध्ये प्रत्येक व्यक्तीला मिळणारे मूलभूत हक्क नमूद केले आहे जसे की जगण्याचा हक्क, स्वातंत्र्य, शिक्षण, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समानता इत्यादी. १९५० मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाने ठराव पास करून १० डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

महत्त्वाचे मुद्दे
हा दिवस केवळ साजरा करणे नव्हे तर जगभरात मानवी हक्कांचे उल्लंघन होत असलेल्या ठिकाणी आवाज उठवणे, त्याविरुद्ध लढणे हा आहे. यात बालहक्क, स्त्री हक्क, अल्पसंख्याक हक्क, शरणार्थी हक्क, कामगार हक्क यांचा समावेश होतो. "सर्व मानव स्वतंत्र जन्माला येतात आणि त्यांना समान प्रतिष्ठा व समान हक्क आहे."
ALSO READ: एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या<> Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: महात्मा जोतिबा फुले संपूर्ण माहिती Mahatma Jyotirao Phule

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

ठाणे-दिवा मेट्रो प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने दिली मंजुरी, लाखो प्रवाशांना दिलासा

शरद पवारांनी प्रवक्त्यांच्या पूर्वीच्या नियुक्त्या रद्द केल्या , विद्या चव्हाण आणि महेश तापसे यांनी जबाबदारी घेतली

अभिजीत दीपके यांच्या घरी सीजेपी कोअर कमिटीची बैठक झाली, राजकारणाविरोधात मोहीम सुरू करणार

सुनेत्रा पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बारामतीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या पुतळ्याचे दहन

SKIMS India: किम कार्दशियनचा ब्रँड दिल्ली आणि मुंबईमध्ये स्टोअर्ससह भारतात प्रवेश करणार

पुढील लेख