शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. सामान्य ज्ञान
Written By
Last Updated : शनिवार, 5 मार्च 2022 (14:36 IST)

Chanakya Niti: तोंडावर गोड आणि पाठीमागील वाईट बोलणारे विनाशाचे कारण बनू शकते, अशा लोकांपासून सावध रहा

आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार तुम्हाला थोडे कठोर वाटतील, पण हेच कठोरपणा जीवनाचे सत्य आहे. धावपळीच्या जीवनात आपण या विचारांकडे दुर्लक्ष करू शकतो, परंतु जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत हे शब्द आपल्याला मदत करतील. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी आणखी एका विचाराचे विश्लेषण करू. आजचा विचार त्या लोकांवर आधारित आहे जे त्यांच्या पाठीमागे वाईट करतात आणि त्यांच्या तोंडावर कौतुक करतात.
 
परोक्षे कार्य्यहन्तारं प्रत्यक्षे प्रियवादिनम्।
वर्ज्जयेत्तादृशं मित्रं विषकुम्भम्पयोमुखम् ।।
 
चाणक्य नीतीच्या या श्लोकच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे की व्यक्तीने अशा लोकांशी सांभाळून वागावे जे तोंडावर गोड बोलतात आणि वळल्यावर वाईट विचार करतात. हे विषाच्या मटक्यासमान असतात ज्यांची वरील परत दुधाने भरलेली असते.
 
हे लोक संधी साधून नुकसान करतात. हे लोक आपली योजना अयशस्वी करण्याच्या प्रयत्नात असतात. आपली प्रतिमा धूमिळ करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून चेहरा बघून बोलणार्‍या लोकांपासून सतर्क राहणे गरजेचे आहे. असे लोक स्वार्थ पूर्तीसाठी काहीही करु शकतात. त्यांच्यवर विश्वास ठेवू नये. अशा लोकांना ओळखून त्यांच्यापासून अंतर राखणे योग्य.